शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

जनकृषी केंद्राचा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 15:40 IST

वाढता शेती खर्च, यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आदी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जनकृषी केंद्रांची संकल्पना मांडली आहे.

ठळक मुद्देकेंद्र, राज्य सरकारचे दुर्लक्ष१६०० गावांनी पाठविले होते ठराव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढता शेती खर्च, यातून निर्माण होणारा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या आदी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जनकृषी केंद्रांची संकल्पना मांडली आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारकडे दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविण्यात आला, मात्र सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.एकच मिशन शेतकरी आरक्षण या चळवळीची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातून करण्यात आली. या चळवळीच्यावतीने शेतकरी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून याबाबत राज्यासह देशाच्या विविध भागांतून १६०० ठराव सरकारला पाठविण्यात आले. या ठरावात जनकृषी केंद्राच्या निर्मितीचाही समावेश आहे.शेतकऱ्यांचा शेती खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी जनकृषी केंद्र उघडण्यात यावे, असा प्रस्ताव एकच मिशन शेतकरी आरक्षणाने केंद्र व राज्य सरकारकडे दिला होता, मात्र यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात महागडी बियाणे व खते खरेदी करावी लागणार आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात शेतकºयांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यामागे उत्पादित होणाऱ्या मालाला बाजारभाव नसल्याने मुख्य कारण सांगितले जाते. शेतीचा वाढता खर्च, त्या तुलनेत कमी होणारे उत्पादन व बाजारपेठेत शेतमाल आल्यानंतर पडणारे भाव आदी अनेक कारणे आहेत. यावर उपाय म्हणून एकच मिशन शेतकरी आरक्षणने जन कृषी केंद्र सुरू करण्याबाबत सरकारला सुचविले होते. या प्रस्तावाला प्रत्येक गावात शासनाच्या वतीने जन कृषी केंद्र सुरू करण्यात यावे, शेतकऱ्यांना विविध जातीचे संशोधित व पारंपरिक बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. हे बियाणे अल्प दरात वा मोफत उपलब्ध व्हावे, अशा अनेक मागण्या या प्रस्तावातून करण्यात आल्या आहेत. एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, अजूनही केंद्र व राज्य सरकारने जन कृषी केंद्र सुरू केलेले नाही. राज्याच्या विविध जिल्हा सामान्य रुग्णालयात जेनेरिक औषध दुकान सरकारने सुरू केले. त्याच धर्तीवर प्रत्येक तालुका मुख्यालयात किमान एक जन कृषी केंद्र सुरू करावे, अशी मागणी होती. यापूर्वी राज्यात शेतकºयांना खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून परमीटवर बियाणे पुरवठा करण्यात येत होता. मात्र, खरेदी विक्री संस्था डबघाईस आल्याने हा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे जनकृषी केंद्र फायदेशीर ठरणारे आहे.शेतकरी आरक्षणावर अजूनही मौनएकच मिशन शेतकरी आरक्षणाच्या माध्यमातून शेती व शेतकºयाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. विविध ग्रामपंचायतींनी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीने याबाबत ठराव पारित केले. केंद्र व राज्य सरकारसह विरोधी पक्ष नेत्यांना व राजकीय पक्ष प्रमुखांना त्याच्या प्रति देण्यात आल्या. याबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.

रसायनामुळे होणाऱ्या स्वास्थ्यहानीला आळा घालण्यासोबतच शेतकऱ्यांच्या उत्पन्नातील नफा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जन कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत बियाणे, सेंद्रिय खते, औषधी देण्याचा पर्याय सुचविण्यात आला आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकार याबाबत उदासीन आहे. तेलंगणा सरकारने या प्रस्तावातील अनेक बाबींवर अंमलबजावणी केली आहे.- शैलेश अग्रवाल, प्रणेते, एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार