शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

बौद्धधम्म परिषदेत वेगळ्या विदर्भाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:42 IST

वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे.

ठळक मुद्देअनिल जवादे यांनी मांडला मुद्दा : ‘जय भीम, जय विदर्भ’च्या दिल्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे. त्यांनी बिनखर्चाची शेती खर्चाची करुन या शेतकरी समाजाला वाळवी लावली आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आणि या विदर्भाच्या भूमीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी विदर्भ वेगळा करण्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यासाठी सर्व समाजबांधवांची एकजुट आवश्यक आहे, असे मत बौद्धधम्म परिषदेचे उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे यांनी मांडले. त्यांच्या या मुद्यांचे सर्वांनी स्वागत करुन ‘जय भीम, जय विदर्भ’ च्या दिल्या घोषणा देत ठरावही घेतला.स्थानिक सेवाग्राम रोडलगतच्या महिलाश्रम शाळेच्या मैदानावर ३२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून भदन्त शांतरक्षीत महाथेरो, मुख्य मार्गदर्शक राजरत्न आंबेडकर, स्वागताध्यक्ष डि.के.पाटील, सुनिल ढाले यांच्यासह, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, डॉ. राजा टाकसाळे, विशाल मानकर, डॉ.राजकुमार शेंडे, उमेश म्हैसकर, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त सत्यानंद महाथेरो, भदन्त प्रज्ञाशील महाथेरो, भदन्त धम्मज्योती महाथेरो, भदन्त धम्मसेन महाथेरो, भदन्त विपश्यी महाथेरो, भदन्त श्रीपाद थेरो, भदन्त महामोग्गलयान व भदन्त अभयनायक यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. सकाळी भदन्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, बुद्धवंदना व धम्मदेसनाने परिषदेला सुरुवात झाली. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी हिंगणघाटच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत, अभिवादन गीत व नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या परिषदेदरम्यान सुहास थुल, निरज ताकसांडे, प्रजापाल शेंदरे, विकास भालांदरे व धनंजय नाखले यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष भदत्न महाथेरो यांनी त्रीशरण, पंचशील तसेच बुद्ध, धम्म व संघ वंदना सर्वांच्या सोबत म्हणून संस्कृतीची जोपासण्याचा सल्ला दिला.तर दुपारच्या सत्रात ‘बौद्ध धम्माची वास्तविकता आदर्श आणि आपण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. सुषमा अंधारे व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे संचालन व प्रास्ताविक भदन्त राजरत्न यांनी केले. या परिषदेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.