शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

बौद्धधम्म परिषदेत वेगळ्या विदर्भाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:42 IST

वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे.

ठळक मुद्देअनिल जवादे यांनी मांडला मुद्दा : ‘जय भीम, जय विदर्भ’च्या दिल्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वैदर्भीय तसेच या नागभूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती. आज याच भूमीतील शेतकरी व शेतमजूर राज्यकर्त्यांच्या लुटीच्या व्यवस्थेत भरडल्या जात आहे. विदर्भातील जवळपास ३३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून याला राजकीय धोरणच जबाबदार आहे. त्यांनी बिनखर्चाची शेती खर्चाची करुन या शेतकरी समाजाला वाळवी लावली आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी आणि या विदर्भाच्या भूमीत परिवर्तन घडवून आणण्यासाठी विदर्भ वेगळा करण्याशिवाय पर्याय नाही, आणि त्यासाठी सर्व समाजबांधवांची एकजुट आवश्यक आहे, असे मत बौद्धधम्म परिषदेचे उद्घाटक विदर्भवादी अनिल जवादे यांनी मांडले. त्यांच्या या मुद्यांचे सर्वांनी स्वागत करुन ‘जय भीम, जय विदर्भ’ च्या दिल्या घोषणा देत ठरावही घेतला.स्थानिक सेवाग्राम रोडलगतच्या महिलाश्रम शाळेच्या मैदानावर ३२ व्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष म्हणून भदन्त शांतरक्षीत महाथेरो, मुख्य मार्गदर्शक राजरत्न आंबेडकर, स्वागताध्यक्ष डि.के.पाटील, सुनिल ढाले यांच्यासह, जिल्हा परिषद सदस्य धनराज तेलंग, डॉ. राजा टाकसाळे, विशाल मानकर, डॉ.राजकुमार शेंडे, उमेश म्हैसकर, भदन्त सुमेधबोधी महाथेरो, भदन्त सत्यानंद महाथेरो, भदन्त प्रज्ञाशील महाथेरो, भदन्त धम्मज्योती महाथेरो, भदन्त धम्मसेन महाथेरो, भदन्त विपश्यी महाथेरो, भदन्त श्रीपाद थेरो, भदन्त महामोग्गलयान व भदन्त अभयनायक यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती. सकाळी भदन्त महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण, बुद्धवंदना व धम्मदेसनाने परिषदेला सुरुवात झाली. त्यानंतर भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी हिंगणघाटच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत, अभिवादन गीत व नृत्य सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या परिषदेदरम्यान सुहास थुल, निरज ताकसांडे, प्रजापाल शेंदरे, विकास भालांदरे व धनंजय नाखले यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष भदत्न महाथेरो यांनी त्रीशरण, पंचशील तसेच बुद्ध, धम्म व संघ वंदना सर्वांच्या सोबत म्हणून संस्कृतीची जोपासण्याचा सल्ला दिला.तर दुपारच्या सत्रात ‘बौद्ध धम्माची वास्तविकता आदर्श आणि आपण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर, ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. सुषमा अंधारे व संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. परिषदेचे संचालन व प्रास्ताविक भदन्त राजरत्न यांनी केले. या परिषदेला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.