शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर सोयाबीनचा ‘तोडा’ करण्याची वेळ

By admin | Updated: October 20, 2014 23:18 IST

वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत

वायगाव (नि.) : वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत असलेल्या शेतकऱ्यांवर सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाल्याने सवंगणी न करता तोडा करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदाही शेतकरी संकटात सापडला. कापसातूनही फारशा उत्पन्नाची आशा राहिलेली नाही. यावर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दुबार-तिबार पेरणीनंतर मध्यंतरी आलेल्या पावसाने पिकांना काहीसे जीवनदान दिल्याने सोयाबिन कसेबसे उगवले. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली. पाण्याअभावी सोयाबीनच्या शेंगाही व्यवस्थित भरलेल्या नाही. ज्यामध्ये काहीसे दाणे भरले आहेत तेही ज्वारीच्या दाण्यासारखे आहेत. या कारणाने एकंदरित उत्पन्न तर कमी झालेच पण जेथे एका झाडाला ६० ते ७० शेंगा यायच्या तेथे यंदा केवळ १५ ते २० शेंगाच पहावयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा एक तर त्यात जनावरे सोडावी किंवा सवंगणीपेक्षा त्याचा तोडा करावा, असा विचार शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागला आहे.या परिस्थितीमुळे सोयाबीन पासून उत्पन्नाची कोणतीही आशा आता शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर कीडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरलेली नाहीत. नांगरणीपासून वेचणीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. मात्र आजच्या स्थितीत एकरी दोन क्विंटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळले का अशी शंकाही येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती केविलवाणी झालेली आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.(वार्ताहर)