शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

शेतकऱ्यांवर सोयाबीनचा ‘तोडा’ करण्याची वेळ

By admin | Updated: October 20, 2014 23:18 IST

वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत

वायगाव (नि.) : वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत असलेल्या शेतकऱ्यांवर सोयाबीनचे अत्यल्प उत्पादन झाल्याने सवंगणी न करता तोडा करण्याची वेळ आली आहे. निसर्गाच्या अवकृपेने यंदाही शेतकरी संकटात सापडला. कापसातूनही फारशा उत्पन्नाची आशा राहिलेली नाही. यावर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दुबार-तिबार पेरणीनंतर मध्यंतरी आलेल्या पावसाने पिकांना काहीसे जीवनदान दिल्याने सोयाबिन कसेबसे उगवले. मात्र त्यानंतर पावसाने मारलेल्या दडीने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली. पाण्याअभावी सोयाबीनच्या शेंगाही व्यवस्थित भरलेल्या नाही. ज्यामध्ये काहीसे दाणे भरले आहेत तेही ज्वारीच्या दाण्यासारखे आहेत. या कारणाने एकंदरित उत्पन्न तर कमी झालेच पण जेथे एका झाडाला ६० ते ७० शेंगा यायच्या तेथे यंदा केवळ १५ ते २० शेंगाच पहावयास मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन काढण्यापेक्षा एक तर त्यात जनावरे सोडावी किंवा सवंगणीपेक्षा त्याचा तोडा करावा, असा विचार शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागला आहे.या परिस्थितीमुळे सोयाबीन पासून उत्पन्नाची कोणतीही आशा आता शेतकऱ्यांना राहिलेली नाही. कपाशीचीही अशीच अवस्था आहे. लाल्या आणि इतर कीडींच्या आक्रमणाने पऱ्हाटीच्या झाडावर बोंडेच धरलेली नाहीत. नांगरणीपासून वेचणीपर्यंतच्या प्रत्येक कामासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करावा लागतो. मात्र आजच्या स्थितीत एकरी दोन क्विंटलही कापूस होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लागवडीचा खर्चही निघेल की नाही अशी भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळले का अशी शंकाही येऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची स्थिती केविलवाणी झालेली आहे. एका पाठोपाठ एक संकटाचा मारा झेलणारा शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.(वार्ताहर)