शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:47 IST

प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून विशेष मोहीम । उपप्रादेशिक परिवहनच्या दोन चमू सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सदर विभागाने दोन चमू सज्ज केल्या असून या चमूतील अधिकारी नियमांना बगल देणाऱ्या आॅटाचालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करणार आहेत.प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या एका आॅटो रिक्षातून १२ वर्षावरील तीन जणांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तसा नियम आहे. परंतु, सध्या सदर नियमाला डावलूनच आॅटो रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची ने-आण करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, काही आॅटोचालक मनमर्जीनेच विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार न्यायालयाच्या सूचनांना पाठ दाखविणारा असल्याने तसेच एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने मनमर्जीने काम करणाºया आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग १ जुलैपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणार आहे. त्यासाठी दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. या चमूतील अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन नियमांना पाठ दाखविणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.१७४ स्कूल बससेचा परवाना केला निलंबितउपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १७४ स्कूल बसेसचा परवानाच निलंबित केला आहे. या बसेसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास ते वाहनच जप्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण ४७४ छोट्या-मोठ्या स्कूल बसेस आहेत.प्रवासी वाहतुकीसाठी ३ हजार १६८ आॅटोरिक्षांची नोंदणीवर्धा जिल्ह्यात एकूण ५ हजार आॅटो रिक्षा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार १६८ आॅटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. परंतु, एखाद्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आल्यास त्या आॅटोचा परवानाच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात येणार आहे.मुख्याध्यापकांच्या अडचणीत पडणार भरज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्यपणे आॅटो रिक्षातून होत आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापकावरही कारवाई करण्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. त्याला वरिष्ठ अधिकाºयांकडून हिरवी झेंडी मिळाल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून १ जुलैपासून विशेष मोहीम आम्ही राबविणार आहो. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. शिवाय परवाना निलंबित करण्यात आलेल्या १७४ स्कूल बसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे, असे आढळल्यास ती स्कूल बसच जप्त करण्यात येणार आहे.- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.