शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

आॅटोतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:47 IST

प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून विशेष मोहीम । उपप्रादेशिक परिवहनच्या दोन चमू सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने १ जुलैपासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सदर विभागाने दोन चमू सज्ज केल्या असून या चमूतील अधिकारी नियमांना बगल देणाऱ्या आॅटाचालकांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करणार आहेत.प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या एका आॅटो रिक्षातून १२ वर्षावरील तीन जणांची वाहतूक करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय तसा नियम आहे. परंतु, सध्या सदर नियमाला डावलूनच आॅटो रिक्षाचालक प्रवासी वाहतूक करीत असल्याचे पाहावयास मिळते. विशेष म्हणजे, कुठल्याही प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची ने-आण करू नये, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, काही आॅटोचालक मनमर्जीनेच विद्यार्थ्यांची वाहतूक करीत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार न्यायालयाच्या सूचनांना पाठ दाखविणारा असल्याने तसेच एखाद्या मोठ्या अनुचित घटनेला आमंत्रण देणारा असल्याने मनमर्जीने काम करणाºया आॅटोचालकांना वठणीवर आणण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग १ जुलैपासून जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणार आहे. त्यासाठी दोन चमू तयार करण्यात आल्या आहेत. या चमूतील अधिकारी व कर्मचारी जिल्ह्यातील विविध भागात प्रत्यक्ष जाऊन नियमांना पाठ दाखविणाऱ्यांवर कारवाई करणार आहे.१७४ स्कूल बससेचा परवाना केला निलंबितउपप्रादेशिक परिवहन विभागाने तब्बल १७४ स्कूल बसेसचा परवानाच निलंबित केला आहे. या बसेसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळल्यास ते वाहनच जप्त करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात एकूण ४७४ छोट्या-मोठ्या स्कूल बसेस आहेत.प्रवासी वाहतुकीसाठी ३ हजार १६८ आॅटोरिक्षांची नोंदणीवर्धा जिल्ह्यात एकूण ५ हजार आॅटो रिक्षा असल्याची नोंद घेण्यात आली आहे. त्यापैकी ३ हजार १६८ आॅटो रिक्षांना प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. परंतु, एखाद्या आॅटो रिक्षातून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जात असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आल्यास त्या आॅटोचा परवानाच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून निलंबित करण्यात येणार आहे.मुख्याध्यापकांच्या अडचणीत पडणार भरज्या शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक नियमबाह्यपणे आॅटो रिक्षातून होत आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापकावरही कारवाई करण्याचे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन आहे. त्याला वरिष्ठ अधिकाºयांकडून हिरवी झेंडी मिळाल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांची सुरक्षा हा उद्देश केंद्रस्थानी ठेवून १ जुलैपासून विशेष मोहीम आम्ही राबविणार आहो. त्यासाठी दोन चमू सज्ज करण्यात आल्या आहेत. शिवाय परवाना निलंबित करण्यात आलेल्या १७४ स्कूल बसमधून जर विद्यार्थ्यांची वाहतूक होत आहे, असे आढळल्यास ती स्कूल बसच जप्त करण्यात येणार आहे.- विजय तिराणकर, सहा. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा.