शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकप्रतिनिधींनाच रस्त्यावर यावे लागते हे दुर्भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:47 IST

शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जर नगर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते. या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार ....

ठळक मुद्देरणजित कांबळे : जिल्हाधिकाºयांशी चर्चेनंतर पाचव्या दिवशी उपोषणाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर प्रशासनाची जबाबदारी आहे. ती जर नगर प्रशासन पूर्ण करू शकत नसेल तर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते. या देशाच्या राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार स्थानिक प्रशासनाच्या कामांचा लेखाजोखा मागण्याचा सर्वांना अधिकार आहे; पण नगर परिषदेने विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यानं लोकांच्या समस्यांसाठी लोकप्रतिनिधींना रस्त्यावर यावे लागते, हे लोकशाहीत दुर्भाग्य आहे, असे मत आ. रणजित कांबळे यांनी व्यक्त केले.१३ डिसेंबरपासून पालिकेतील बसपा, काँग्रेस व अपक्ष यांच्या आघाडीने विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन केले. नगरसेवक कुंदन जांभुळकर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी रविवारी आ. रणजीत कांबळे यांच्या हस्ते सरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी आ. कांबळे यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याशी चर्चा करीत मागण्या कळविल्या. काही समस्यांबाबत आश्वासन मिळाल्याने नगरसेवक कुंदन जांभुळकर व सहकाºयांनी उपोषण मागे घेतले.आ. कांबळे यांनी शासनाच्या ज्या योजना असतात, त्या जनतेच्या पैशाने जनतेसाठी राबविल्या जातात. त्यात गैरप्रकार होत असेल तर माहितीचा अधिकार राज्यघटनेनेने सर्वांना दिला. सुभाषनगर येथील अतिक्रमणग्रस्त विस्थापितांना रमाई घरकूल योजनेत घरे बांधून देण्याचा प्रश्न पोलीस निरीक्षक मुरलीधर बुराडे यांच्या मध्यस्थीने समाजकल्याण वर्धा यांनी दिलेल्या पत्रामुळे निकाली निघाला. स्वच्छता निरीक्षक मनोज खोडे यांचा पदभार अनिल अंबादे यांना दिल्याचे लेखी पत्र दिले. अन्य समस्यांवर आ. कांबळे यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली असून त्या सोडविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.ठाणेदार बुराडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. यावेळी काँग्रेसचे नेते मनोज वसू, शहराध्यक्ष रमेश सावरकर, महासचिव अश्विन शाह, मौला शरीफ, महेश तेलरांधे, अशोक इंगळे यासह गटनेते डॉ. प्रमोद नितनवरे, प्रकाश टेंभुर्णे, शोभा ठवकर, करुणा राऊत, जमना खोडे, रितेश मडावी, चंद्रकांत डोईफोडे व बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नगर प्रशासनातर्फे कुणीही उपस्थित नसल्याने कुजबूज होती.

टॅग्स :Ranjit Kambaleरणजित कांबळे