शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

७० वर्षांनी झाला पांदण रस्ता मोकळा

By admin | Updated: February 7, 2016 00:18 IST

लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्ता गत अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बेपत्ता झाला होता. या बाबीला ७० वर्षे पूर्ण झालीत.

लहान आर्वी ते अंतोरा मार्ग : दोन दिवस उभे राहून हटविले अतिक्रमणआष्टी (शहीद) : लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्ता गत अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बेपत्ता झाला होता. या बाबीला ७० वर्षे पूर्ण झालीत. सदर प्रकरण शासनदरबारी होते. अखेर तहसीलदार सीमा गजभिये यांनी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावत निकाल जाहीर केला. यात स्वत: दोन दिवस उभे राहून अतिक्रमण काढले. या कारवाईमुळे शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्त्यावर ५०० मीटर अतिक्रमण झाले होते. सदर अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याची मागणी शेतकरी देविदास पात्रे माणिकनगर, शंकर राठी लहानआर्वी, गंगाधर ठाकरे अंतोरा यांनी गत अनेक वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे केली होती. या पांदण रस्त्याला लागून एका राजकीय लोकप्रतिनिधीचे शेत आहे. त्यांनी पांदण रस्त्यावर कब्जा करून शेतकऱ्यांना वेठीस धरले होते. याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून चौकशी सुरू होती. यात तहसीलदार सीमा गजभिये यांनी घटनास्थळाची चौकशी व प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. पांदण रस्त्यावर अतिक्रमण असल्याची खात्री झाली असता ते हटविण्यासाठी तयारी करण्यात आली.या प्रकरणाचा निकाल जाहीर होताच जेसीबी मशीन व पोलीस बंदोबस्त बोलवून अतिक्रमण पूर्णपणे काढण्यात आले. पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटू नये यासाठी सदर लोकप्रतिनिधी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे ‘स्टे’ आणण्याकरिता गेला होता; पण जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार गजभिये यांच्याकडून वस्तुस्थिती जाणून घेऊन निकाल कायम ठेवला. परिणामी, सर्व अंदाजांना फोल ठरवित ७० वर्षांपासून असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. यासाठी नायब तहसीलदार मुदृलता मोरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. गजभिये व मोरे यांच्या धाडसी कारवाईमुळे अतिक्रमण करणारे चांगलेच अडचणीत आले आहेत.(प्रतिनिधी)अन्य पांदण रस्तेही होणार मोकळेजिल्ह्यात अनेक ठिकाणी पांदण रस्ते अतिक्रमित झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात ये-जा करताना अत्यंत त्रास सहन करावा लागत होता. शासकीय पांदण रस्ते मोकळे करण्याची मागणी शेतकरी, ग्रामस्थांकडून करण्यात येते; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येते. आता आष्टी तालुक्यातील लहानआर्वी ते अंतोरा हा पांदण रस्ता ७० वर्षांनंतर मोकळा झाला. यामुळे तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अन्य अतिक्रमित पांदण रस्तेही मोकळे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे. आर्वी, कारंजा तालुक्यातील पांदण रस्तेही शेतकऱ्यांना वहिवाटीकरिता मोकळे करून देणे गरजेचे आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करताना दिसतात.लहानआर्वी ते अंतोरा पांदण रस्त्यावरील लोकप्रतिनिधीचे अतिक्रमण हटल्याने अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यातील अन्य पांदण रस्तेही आता मोकळे होण्यास वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहेत. तहसीलदार गजभिये यांनी अन्य प्रकरणांचाही मागोवा घेत रस्ते मोकळे करणे गरजेचे झाले आहे.