शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळा लागला; पण रस्त्यांची कामे अद्यापही प्रलंबित

By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST

परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़

मोझरी (शे़) : परिसरातील रस्त्यांची बांधकामाच्या निकृष्ट दर्जामुळे दुरवस्था झाली आहे़ रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांत वाढ झाली आहे़ पावसाळा सुरू झाला असताना परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित ठेवण्यात आलीत़ यामुळे नागरिकांत असंतोष पसरला आहे़ याकडे लक्ष देत किमान रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे़मोझरी-कानगाव या सात किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे़ अनेक दिवसांपासून याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर चार पुलांपैकी एका पुलावर ऐन मध्यभागी खड्डे पडले आहे़ यातून सळाखी बाहेर निघून वर्तुळाकार खड्डे तयार झालेत़ हा प्रकार झाकण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने त्यावर माती टाकून खड्डे बुजविले; पण पावसामुळे चिखल निर्माण झाला आहे़ यात अनेकांना वाहने घसरल्याने अपघाताला सामोरे जावे लागले़ या पुलाची अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ उर्वरित तीन पुलांवर मधोमध भगदाडे पडलीत़ बांधकाम विभाग यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसते़ मोझरी-खानगाव-आंबोडा या १० किमी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचेच साम्राज्य आहे़ यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे़स्वातंत्र्याची ६६ वर्षे लोटूनही मोझरी-कापशी या सहा किमी रस्त्याचे अद्यापही मजबुतीकरण व डांबरीकरण पूर्णत्वास गेलेले नाही़ मोझरी-पोटी या तीन किमी रस्त्यावर सर्वत्र खड्डेचे खड्डे आहेत. मोझरी-कोसुर्ला या चार किमी रस्त्याचे डांबर पूर्णत: उखडले आहे; पण अद्याप रस्त्याची दुरूस्ती करण्यात आलेली नाही़ कंत्राटदार केवळ संबंधित कामे पार पाडून आपले देयके काढून मोकळे होत असल्याचे दिसते़ दर्जाहीन कामांमुळे अल्पावधीत खराब होणाऱ्या रस्त्याने प्रवास करताना वाहन धारक व सामान्यांना त्रास सहन करावा लागतो़ वर्धा ते राळेगाव या राज्यमार्गावरील पाथरी चौरस्ता ते कापशी या १३ किमी रस्त्याचे अद्यापही रुंदीकरण करण्यात आले नाही़ यामुळे वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे़ वाढती रहदारी लक्षात घेता कानगाव-मोझरी रस्त्याचेही रुंदीकरण करणे गरजेचे झाले आहे़सार्वजनिक व जि़प़ बांधकाम विभागाचे मात्र या ग्रामीण रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे़ परिसरातील रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़(वार्ताहर)