शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बाळाच्या काळजीने बालमृत्यूवर आळा घालणे शक्य

By admin | Updated: December 4, 2015 02:23 IST

बालकांच्या आजाराला, बालमृत्यूला आळा घालावयाचा असेल तर बालक सुदृढ राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवजात शिशूची काळजी घेणे आवश्यक आहे.

अभ्युदय मेघे : नवजात शिशू सप्ताहात जनजागृतीपर कार्यक्रमवर्धा : बालकांच्या आजाराला, बालमृत्यूला आळा घालावयाचा असेल तर बालक सुदृढ राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी नवजात शिशूची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, बालक सुदृढ असेल तर कुटुंब व देश सुदृढ राहील, असे मत दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे यांनी व्यक्त केले. राधिकाबाई मेघे स्मृती परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाद्वारे आयोजित नवजात शिशू सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या सप्ताहानिमित्त परिचारिका, महाविद्यालयाचा बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग व सामाजिक परिचर्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आचार्य विनोबा भावे रुगणालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आयोजित कार्यक्रमालामुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर.सी. गोयल, औषधीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय दिवान, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमर ताकसांडे, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, प्राचार्य बी.डी. कुलकर्णी, प्राचार्य बेबी गोयल, नर्सिंग संचालक सिस्टर टेसी सॅबास्टियन, अधिष्ठाता वैशाली ताकसांडे, अख्तरी शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नवजात शिशूची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ. तुषार जगझापे, डॉ. शिल्पी गायधने यांनी मार्गदर्शन केले. यानंतर एम.एस.सी. नर्सिंग, पी.बी.बी.एस. सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. या सप्ताहात प्रसूती विभाग, बालरोग विभाग येथे कार्यरत परिचारिका, गरोदर व बाळंतमातांसाठी विशेष व्याख्याने, आरोग्य शिक्षण, नाटिका असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय देवळी आरोग्य केंद्रात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष शर्मा, नाक, कान व घसारोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हात धुणे, तापमान व्यवस्थापन, स्तनपान, डोळे, कातडी आणि नाळ याची काळजी, लसीकरण, धोक्याची लक्षणे आदींबाबत बालपरिचर्या विभाग प्रमुख अर्चना मौर्या, दीपलता मेंढे, बिबीन कुरियन, अर्चना तेलतुंबडे, मंजुषा महाकाळकर, अर्चना ताकसांडे, शालिनी मून, खुशबू मेश्राम, मीनल डंभारे, अरुंधती दगडकर यांनी प्रात्यक्षिक दिले. या संपूर्ण कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)