शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

बापूंच्या खऱ्या कामाचा विसर हीच सध्या चिंतेची बाब आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:35 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे.

ठळक मुद्देरामदास भटकळ : ‘गांधी विचार आणि मराठी साहित्य’ वर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात देशावर सत्ता जरी इंग्रजांची होती तरी कोट्यावधी जनतेच्या मनावर अधिराज्य गांधींचेच होते. त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासोबतच गांधींचे रचनात्मक कार्यही सतत सुरू होते; पण याच कार्याचा समाजाला विसर पडला आहे. साहित्य, कला, संगीत, कारागिरी, पर्यावरण, पत्रकारिता, आरोग्य, विज्ञान अशा अनेक अंगाने त्या काळातही गांधींचा लोकांवर प्रभाव होता, असे प्रतिपादन गांधी विचारक आणि साहित्यिक डॉ. रामदास भटकळ यांनी केले.महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सेवाग्राम आश्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, विदर्भ साहित्य संघ शाखा वर्धा व यशवंतराव दाते स्मृती संस्थेच्यावतीने ‘गांधी विचार आणि मराठी साहित्य’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, लेखक रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ, प्रा. डॉ. राजेंद्र मुंढे, डॉ. इंद्रजीत ओरके, डॉ. विलास देशपांडे, संजय इंगळे तिगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.भटकर पुढे म्हणाले, गांधी केवळ जनतेच्या भावनेला हात घालत नव्हते, तर ते मानवी समूहाचे आणि समूहाच्या मानसिकतेचेही उत्कृष्ट अभ्यासक होते. गांधी वैज्ञानिक व बुद्धिवादीही होते. म्हणूनच आइनस्टाईन आणि बर्ट्रान रसेल गांधींबद्दल सतत आदर व्यक्त करतात. साधनांच्या वापरापासून तर साधन शूचितेपर्यंतचा गांधींचा प्रवास अवघड होता. गांधींच्या दृष्टीने धर्म म्हणजे नैतिकता. माणसाने आपला धर्म सोडू नये, असे जेव्हा गांधी म्हणत तेव्हा त्यांना रुढार्थाने धर्म म्हणायचा नव्हता, तर नैतिकतेचे प्रत्येकाने पालन करावे इतकेच सांगायचे होते. सर्वांगीण विचार, सर्वोदय, सर्वहारांचे सुख हाच गांधीविचारांचा पाया आहे. म्हणूनच गांधी विचारांचा प्रभाव वर्षानुवर्षे जनमानसावर राहणारच असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.गांधीजी इतक्या साºया विश्वाने स्वीकारलेल्या महात्म्याला सुरुवातीला मराठी माणसाने स्वीकार करायला कुचराई केली. महाराष्ट्रातील गुणवंतांनी गांधी हे बहुजनांचे आहे, बुद्धीवादी नाहीत म्हणून स्वीकार केला नाही. आता हे गुणवंत किती बुद्धिवंत होते हा प्रश्न कालोतिहासात गडप झाला असल्याचेही यावेळी भटकर म्हणाले.रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी गांधी विचारांचा आजच्या काळात अन्वयार्थ लावणे आणि आजच्या तरुणांच्या प्रश्नांना गांधी विचारांशी जोडणे, ही काळाची गरज असल्याचे सांगितले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मराठी साहित्यावर गांधींचा प्रभाव नाही तर मग काय टिळकांचा आहे का? मार्क्सचा तरी प्रभाव मराठी साहित्यावर किती आहे? मुळातच साहित्याचे प्रयोजन जागा सुंदर करण्याचे न मानता ते केवळ प्रतीतीविश्रांती मानत उत्तरकर्तव्योन्मुखता नाकारणारे भारतीय साहित्यशास्त्र हे वैचारीकतेचे व सृजनाचे नातेच स्थापू देत नाही. गांधीनी प्रत्यक्ष उपाययोजनच केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दुसºया सत्रात डॉ. अजय देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या चर्चासत्रात डॉ. किशोर सानप, किशोर बेडकिहाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र मुंडे यांनी केले. संचालन प्रा. एकनाथ मुरकुटे व पद्माकर बाविस्कर यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर व डॉ. विलास देशपांडे यांनी मानले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी