शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST

आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे.

ज्ञानेश्वरी दीदी : भागवत कथा सप्ताहदेवळी : आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे. असेच वातावरण राहिले तर प्रलय निश्चित आहे. धर्माच्या आचरणासोबतच संतमहात्म व त्यांचे विचार अंगिकारून न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे असल्याचे ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांनी व्यक्त केले. स्थानिक श्रीसंत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात त्या बोलत होत्या. मानवाने मानवाप्रमाणे वागणे हीच मानवधर्म शिकविणारी कार्यशाळा आहे. आपल्या संस्कृतीला संतांच्या विचारांची जोड आहे. सर्वधर्म समभाव या विशालतेच्या आधारावर आपली प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे जात-पात न पाहता वैचारिक पात्रतेला महत्व द्या. आध्यात्मिक अनुष्ठानानुसार आपली जीवनपद्धती असू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे आचरण करा, असे ज्ञानेश्वरी दीदींनी प्रवचनात सांगितले.विवाहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक दाखले दिले. सृष्टीचे चक्र चालावे यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. परंतु विवाह संस्काराला आज काळीमा फासला जात आहे. हिंदू धर्मातील १६ संस्कारापैकी एक असलेल्या या संस्काराची पवित्रता राखली जात नसल्याचे शल्य आहे. आज कलियुगाच्या प्रवाहाने हुंड्याच्या वाढत्या मागणीसोबतच लग्नाच्या नावावर पैश्याचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे विवाह हा आदर्श असला पाहिजे. सुसंस्कारिक पिढी जन्माला येण्यासाठी संस्काराचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. वृक्ष किती मोठा झाला यापेक्षा हा वृक्ष लावला कुणी, याची वाच्यता झाली पाहिजे, असेही ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या.खटेश्वर मंदिर परिसरात पाकशाळा बांधली जात असून त्याचा प्रारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाला. श्रीमद् भागवत कथेचा समारोप ३० नोव्हेंबरला होत आहे. यादिवशी महाराजांच्या पादुकासहित शोभायात्रा, दिंडी महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे.(प्रतिनिधी)