शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST

आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे.

ज्ञानेश्वरी दीदी : भागवत कथा सप्ताहदेवळी : आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे. असेच वातावरण राहिले तर प्रलय निश्चित आहे. धर्माच्या आचरणासोबतच संतमहात्म व त्यांचे विचार अंगिकारून न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे असल्याचे ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांनी व्यक्त केले. स्थानिक श्रीसंत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात त्या बोलत होत्या. मानवाने मानवाप्रमाणे वागणे हीच मानवधर्म शिकविणारी कार्यशाळा आहे. आपल्या संस्कृतीला संतांच्या विचारांची जोड आहे. सर्वधर्म समभाव या विशालतेच्या आधारावर आपली प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे जात-पात न पाहता वैचारिक पात्रतेला महत्व द्या. आध्यात्मिक अनुष्ठानानुसार आपली जीवनपद्धती असू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे आचरण करा, असे ज्ञानेश्वरी दीदींनी प्रवचनात सांगितले.विवाहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक दाखले दिले. सृष्टीचे चक्र चालावे यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. परंतु विवाह संस्काराला आज काळीमा फासला जात आहे. हिंदू धर्मातील १६ संस्कारापैकी एक असलेल्या या संस्काराची पवित्रता राखली जात नसल्याचे शल्य आहे. आज कलियुगाच्या प्रवाहाने हुंड्याच्या वाढत्या मागणीसोबतच लग्नाच्या नावावर पैश्याचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे विवाह हा आदर्श असला पाहिजे. सुसंस्कारिक पिढी जन्माला येण्यासाठी संस्काराचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. वृक्ष किती मोठा झाला यापेक्षा हा वृक्ष लावला कुणी, याची वाच्यता झाली पाहिजे, असेही ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या.खटेश्वर मंदिर परिसरात पाकशाळा बांधली जात असून त्याचा प्रारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाला. श्रीमद् भागवत कथेचा समारोप ३० नोव्हेंबरला होत आहे. यादिवशी महाराजांच्या पादुकासहित शोभायात्रा, दिंडी महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे.(प्रतिनिधी)