शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे

By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST

आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे.

ज्ञानेश्वरी दीदी : भागवत कथा सप्ताहदेवळी : आज मानवता सगळीकडे लोप पावत आहे. धर्माच्या आचरणासोबतच न्यायनीतीवर चालणे सगळेजण विसरले आहे. असेच वातावरण राहिले तर प्रलय निश्चित आहे. धर्माच्या आचरणासोबतच संतमहात्म व त्यांचे विचार अंगिकारून न्यायनीतीवर चालणे महत्त्वाचे असल्याचे ज्ञानेश्वरी दीदी आर्वी यांनी व्यक्त केले. स्थानिक श्रीसंत खटेश्वर महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथा सप्ताहात त्या बोलत होत्या. मानवाने मानवाप्रमाणे वागणे हीच मानवधर्म शिकविणारी कार्यशाळा आहे. आपल्या संस्कृतीला संतांच्या विचारांची जोड आहे. सर्वधर्म समभाव या विशालतेच्या आधारावर आपली प्रणाली कार्यरत आहे. त्यामुळे जात-पात न पाहता वैचारिक पात्रतेला महत्व द्या. आध्यात्मिक अनुष्ठानानुसार आपली जीवनपद्धती असू द्या. जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत धर्माचे आचरण करा, असे ज्ञानेश्वरी दीदींनी प्रवचनात सांगितले.विवाहाचे महत्त्व विषद करताना त्यांनी अनेक दाखले दिले. सृष्टीचे चक्र चालावे यासाठी विवाहाचे महत्त्व आहे. परंतु विवाह संस्काराला आज काळीमा फासला जात आहे. हिंदू धर्मातील १६ संस्कारापैकी एक असलेल्या या संस्काराची पवित्रता राखली जात नसल्याचे शल्य आहे. आज कलियुगाच्या प्रवाहाने हुंड्याच्या वाढत्या मागणीसोबतच लग्नाच्या नावावर पैश्याचे शक्तीप्रदर्शन केले जात आहे. त्यामुळे विवाह हा आदर्श असला पाहिजे. सुसंस्कारिक पिढी जन्माला येण्यासाठी संस्काराचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. वृक्ष किती मोठा झाला यापेक्षा हा वृक्ष लावला कुणी, याची वाच्यता झाली पाहिजे, असेही ज्ञानेश्वरी दिदी म्हणाल्या.खटेश्वर मंदिर परिसरात पाकशाळा बांधली जात असून त्याचा प्रारंभ खा. रामदास तडस यांच्या हस्ते झाला. श्रीमद् भागवत कथेचा समारोप ३० नोव्हेंबरला होत आहे. यादिवशी महाराजांच्या पादुकासहित शोभायात्रा, दिंडी महोत्सव तसेच महाप्रसादाचे आयोजन केले आहे.(प्रतिनिधी)