शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंरोजगाराच्या माध्यमातून बेरोजगारीचा प्रश्न सुटेल

By admin | Updated: March 23, 2017 00:51 IST

युवक युवतींनी व गावकऱ्यांनी ग्रामविकासाच्या विविध कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग घेऊन आपलं गाव कस आदर्श होईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

हेमचंद्र वैद्य : युवा आदर्श ग्रामविकास कार्यक्रम आर्र्वी : युवक युवतींनी व गावकऱ्यांनी ग्रामविकासाच्या विविध कार्यक्रमात आपला सक्रीय सहभाग घेऊन आपलं गाव कस आदर्श होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सुटू शकेल. तसेच पाण्याचे योग्य नियोजन व वापर केल्यास बारमाही शेती करून शेतकऱ्यांना मोलाची मदत होवू शकते, असे मत डॉ. हेमंचद्र वैद्य यांनी केले. नेहरू युवा केंद्राद्वारे आयोजित युवा आदर्श ग्राम विकास कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी ते बोलत होते. युवा आदर्श ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पिपंळगाव भोसले ता. आर्वी हे गाव दत्तक घेण्यात आले. येथील युवक युवती व महिलांसाठी पाच दिवसीय शिबिराचे आयोजन स्थानिक धरणग्रस्त बहुउद्देशीय युवा मंडळ, पिंपळगाव यांच्या सहयोगाने करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी आर्वी पंचायत समितीच्या सभापती शिला पवार उपस्थित होत्या. तसेच जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, पिंपळगावच्या ग्रामपंचायत सदस्य सुचिता राऊत, अतुल कातरकर, अनुलोम प्रकल्प समन्वयक महेंद्र शिंदे, ग्रामसेवक, पोलीस पाटील गणपत इंगोले व धरणग्रस्त बहउद्देशीय युवा मंडळ, पिंपळगाव ता. आर्वीचे सचिव सतिश इंगोले उपस्थित होते. संजय माटे युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, युवक युवतींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामविकासात जाडून त्यांना विकासाच्या मुख्य धाराप्रवाहात जोडण्याचा हा प्रयत्न आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजना गावामध्ये राबविल्या जातील. गाव संपूर्ण हागणदारी मुक्त व्हावे, कॅशलेश व्यवहार व्हावेत व तरुणांना कौशल्य विकसाचं प्रशिक्षण देवून त्यांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यास मदत करणे, तसेच पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे योग्य नियोजन करणे अशा विविध संकल्पना गावात राबविण्याचा मानस आहे. प्रास्ताविक धरणग्रस्त बहुउद्देशिय युवा मंडळाचे सचिव सतीश इंगोले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन सुरज राऊत यांनी केले तर आभार विलास राऊत यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)