शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

पाटबंधारे कामगार पूर्ववत कामावर येणार

By admin | Updated: May 30, 2014 00:18 IST

पाटबंधारे विभागात दहा ते बारा वर्षे काम केलेल्या ५२ कामगारांना झिरो बजेटच्या नावाखाली कमी केले होते. ही कपात अन्यायकारण असल्याचे म्हणत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाचा आदेश : कामावरून केले कमीवर्धा : पाटबंधारे विभागात दहा ते बारा वर्षे काम केलेल्या ५२ कामगारांना झिरो बजेटच्या नावाखाली कमी केले होते. ही कपात अन्यायकारण असल्याचे म्हणत या कामगारांनी न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी कामगारांच्या बाजूने निकाल लागला होता. यावर पाटबंधारे विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका खारीज करीत या कामगारांना कामावर घेण्याचा खालच्या न्यायालयाचा आदेश कायम ठेवत या कामगारांना कामावर परत घेण्याचा आदेश निर्गमित केला. सोबतच या कमागारांना टक्के बँक वेजेस देण्याच्या या आदेशात नमूद आहे. सन १९८७ साली सदर ५२ कामगारांना पाटबंधारे विभागाने पैशाची बचत करण्याच्या नावाखाली कामावरून कमी केले होते. त्या आदेशाविरुद्ध कामगार न्यायालय नागपूर येथे सिटूच्या नेतृत्वाखाली प्रकरण दाखल केले. सदर प्रकरणाचा निकाल न्यायालयाने १८ ऑक्टोबर २00२ रोजी दिला. आदेशामध्ये सेवेची संलग्नता कायम ठेवून व बंद काळातील २५ टक्के बँक वेजेस देऊन पूर्ववत सेवेत घेण्याचा निर्णय दिला. कामगार न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पाटबंधारे विभाग औद्योगिक न्यायालय, नागपूर येथे अपिलात गेला. सदर न्यायालयाने १६ मार्च २00६ रोजी कामगार न्यायालयाचाच निर्णय कायम केला. या विरोधात पुन्हा पाटबंधारे विभाग उच्च न्यायालय नागपूर येथे अपिलात गेले. उच्च न्यायालयानेही खालच्या न्यायालयांचा निर्णय कायम ठेवला. यावरही पाटबंधारे विभागाच्यावतीने या कामगारांना कामावर परत न घेता पुन्हा उच्च न्यायालय डबल बेंच नागपूर येथे अपिल दाखल केले. सदर अपिलाचा निर्णयही कामगारांच्या बाजूने लागला. यावेळी कामगारांनी कामावर रूजू करून घेण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सिटू)च्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन केले. पाटबंधारे विभाग पुन्हा सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे अपिलात गेले होते. न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांनी पाटबंधारे विभागाचे अपिल खारीज केले.  न्यायालयाच्या निर्णयानुसार कामागारांना कामावर परत घ्यावे, अशी मागणी आंदोलनात सहभागी कामगारांनी केली आहे. (प्रतिनिधी)