शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

वीज पुरवठ्याअभावी सिंचन विहिरी कुचकामी

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे

टाकरखेड : शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे डिमांडचा भरणा केला; परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्यांना जोडणी मिळाली नाही. यामुळे ओलीताची सोय असतानाही कोरवाहू शेती करण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे.सिंचनासाठी असणाऱ्या विहिरी केवळ विद्युत पुरवठ्याअभावी कुचकामी ठरत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ व्हावा म्हणून सन २००९ मध्ये प्रत्येक तालुक्यात एक हजार विहिरी शंभर टक्के अनुदानावर खोदून देण्याचा धडक कार्यक्रम सुरू केला. या योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न होता. अनेक लाभार्थ्यांनी एका लाखाच्या अनुदानातून तयार होण्याऱ्या विहिरींना आपल्या जवळची रक्कम खर्च करून पूर्ण केल्या. विहिरींना भरपूर पाणी लागले. या विशेष योजनेतील विहिरींना तातडीने वीज पुरवठा दिला जाईल असे फर्मान शासनाने सोडले होते. या विहिरीच्या करारनाम्यासोबत वीज जोडणी अर्जसुद्धा लावला होता.डिमांडची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले; पण दोन वर्षे लोटली तरीही वीज जोडणीचा पत्ता नाही. संबंधित विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या अनेक चकरा सुरू असून उडवाउडवीचे उत्तरे मिळते. यादी यायची आहे तर कधी कंत्राटदाराकडे काम दिले आहे. एकूणच कंपनीला शेतकऱ्यांचे काहीही घेणे देणे नसून वीज कंपनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. परिसरातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. आता उन्हाळा संपला पावसाळा लागला. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)