शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

वीज पुरवठ्याअभावी सिंचन विहिरी कुचकामी

By admin | Updated: June 15, 2014 23:42 IST

शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे

टाकरखेड : शासनाने अत्यल्प व अल्प भुधारक शेतकऱ्यांना जवाहर सिंचन योजनंतर्गत विहिरी देण्याची योजना राबविली. या योजनेतून विहिरी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा मिळण्यासाठी वीज कंपनीकडे डिमांडचा भरणा केला; परंतु दोन वर्षांचा कालावधी लोटला तरीही त्यांना जोडणी मिळाली नाही. यामुळे ओलीताची सोय असतानाही कोरवाहू शेती करण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यांवर आली आहे.सिंचनासाठी असणाऱ्या विहिरी केवळ विद्युत पुरवठ्याअभावी कुचकामी ठरत आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांना सिंचन सुविधेचा लाभ व्हावा म्हणून सन २००९ मध्ये प्रत्येक तालुक्यात एक हजार विहिरी शंभर टक्के अनुदानावर खोदून देण्याचा धडक कार्यक्रम सुरू केला. या योजनेतून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याचा शासनाचा प्रयत्न होता. अनेक लाभार्थ्यांनी एका लाखाच्या अनुदानातून तयार होण्याऱ्या विहिरींना आपल्या जवळची रक्कम खर्च करून पूर्ण केल्या. विहिरींना भरपूर पाणी लागले. या विशेष योजनेतील विहिरींना तातडीने वीज पुरवठा दिला जाईल असे फर्मान शासनाने सोडले होते. या विहिरीच्या करारनाम्यासोबत वीज जोडणी अर्जसुद्धा लावला होता.डिमांडची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने वीजपुरवठा मिळेल असे कंपनीकडून सांगण्यात आले; पण दोन वर्षे लोटली तरीही वीज जोडणीचा पत्ता नाही. संबंधित विभागाच्या कार्यालयात शेतकऱ्यांच्या अनेक चकरा सुरू असून उडवाउडवीचे उत्तरे मिळते. यादी यायची आहे तर कधी कंत्राटदाराकडे काम दिले आहे. एकूणच कंपनीला शेतकऱ्यांचे काहीही घेणे देणे नसून वीज कंपनी केवळ वेळकाढू धोरण अवलंबित आहे. परिसरातील वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी त्रस्त झाला आहे. आता उन्हाळा संपला पावसाळा लागला. त्यामुळे आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)