शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीला अद्यापही सिंचनाचाच आधार

By admin | Updated: June 22, 2016 01:57 IST

मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही.

पावसाची प्रतीक्षा कायमच : मान्सून अद्याप न स्थिरावल्याने पेरण्या लांबणीवरवर्धा : मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही. एकही पाऊस चांगला न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यास धजावलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जी अत्यल्प पेरणी झाली आहे व होत आहे त्याला सिंचनाचाच आधार आहे. त्यांच्याही नजरा आता आकाशाकडे वळल्या आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हात पोळून बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मान्सूनपूर्व पेरणी तर जिल्ह्यात खूपच अत्यल्प झाली. त्यानंतर मान्सून दाखल झाला या भावनेने बळीराजा सुखावला खरा; पण पाऊस अद्याप स्थिरावला नाही. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका अश्या सूचना कृषी विभागानेच दिल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अश्या काहीच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण त्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण मदार सिंचनावरच आहे. परिणामी आकाशात ढग गोळा झाले असतानाही अनेक शेतात स्प्रिंक्लरद्वारे कापाशीला सिंचन केले जात आहे. हेदेखील जास्त दिवस शक्य नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे असून प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काहीच भागात तुरळक पेरण्या झाल्या आहेत. पण दमट वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. त्यामुळे पेरणी चांगल्या पावसानंतरच अशी भूमिका घेतली जात आहे.(शहर प्रतिनिधी) चांगल्या पावसाशिवाय पेरणी नाहीआकाशात काळे ढग गोळा होऊ लागले की आता पाऊस येणारच अशी आशा बळीराजाला असते. त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी पूर्वी शेतकरी पेरणीला सुरुवात करायचा. पण या काही वर्षात पावसाची हुलकावणी सर्वांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाने अनेकवार झेलले आहे. पण आता ती ताकत नसल्याने जोपर्यंत मनासारखा पाऊस येत नाही तोपर्यंत पेरणी करायचीच नाही अशी ठोस आणि सावध भूमिका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी विभागानेही अश्याच सूचना दिल्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण पेरणी नाहीच असे शेतकरी सांगत आहे. सिंचनाच्या भरवश्यावर पेरणी करणारेही आकाशाकडे पाहात आहेत.