शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

पेरणीला अद्यापही सिंचनाचाच आधार

By admin | Updated: June 22, 2016 01:57 IST

मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही.

पावसाची प्रतीक्षा कायमच : मान्सून अद्याप न स्थिरावल्याने पेरण्या लांबणीवरवर्धा : मान्सून आला, मान्सून आला यंदा तो विदर्भावाटे आला अशी हूल उडत असली तरीही तो अद्याप स्थिरावलेला नाही. एकही पाऊस चांगला न झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यास धजावलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात जी अत्यल्प पेरणी झाली आहे व होत आहे त्याला सिंचनाचाच आधार आहे. त्यांच्याही नजरा आता आकाशाकडे वळल्या आहेत. सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे हात पोळून बसलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा पावसाच्या लहरीपणामुळे अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. मान्सूनपूर्व पेरणी तर जिल्ह्यात खूपच अत्यल्प झाली. त्यानंतर मान्सून दाखल झाला या भावनेने बळीराजा सुखावला खरा; पण पाऊस अद्याप स्थिरावला नाही. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका अश्या सूचना कृषी विभागानेच दिल्या. त्यामुळे ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अश्या काहीच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण त्यानंतरही पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण मदार सिंचनावरच आहे. परिणामी आकाशात ढग गोळा झाले असतानाही अनेक शेतात स्प्रिंक्लरद्वारे कापाशीला सिंचन केले जात आहे. हेदेखील जास्त दिवस शक्य नसल्याने सर्वांच्या नजरा आकाशाकडे असून प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील काहीच भागात तुरळक पेरण्या झाल्या आहेत. पण दमट वातावरणामुळे ही पिकेही धोक्यात आहेत. त्यामुळे पेरणी चांगल्या पावसानंतरच अशी भूमिका घेतली जात आहे.(शहर प्रतिनिधी) चांगल्या पावसाशिवाय पेरणी नाहीआकाशात काळे ढग गोळा होऊ लागले की आता पाऊस येणारच अशी आशा बळीराजाला असते. त्यातच थोडा जरी पाऊस झाला तरी पूर्वी शेतकरी पेरणीला सुरुवात करायचा. पण या काही वर्षात पावसाची हुलकावणी सर्वांंनाच ठाऊक आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बळीराजाने अनेकवार झेलले आहे. पण आता ती ताकत नसल्याने जोपर्यंत मनासारखा पाऊस येत नाही तोपर्यंत पेरणी करायचीच नाही अशी ठोस आणि सावध भूमिका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. कृषी विभागानेही अश्याच सूचना दिल्यामुळे उशीर झाला तरी चालेल पण पेरणी नाहीच असे शेतकरी सांगत आहे. सिंचनाच्या भरवश्यावर पेरणी करणारेही आकाशाकडे पाहात आहेत.