शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:33 IST

तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही...

ठळक मुद्देरामदास तडस : ‘संकल्प से सिद्धी’चा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही अशा स्थितीत विदर्भात आत्महत्यांचे प्रमाण वाढले. यावर मात म्हणून पंतप्रधानांनी निम्न वर्धासह इतर ५० टक्के पूर्ण झालेल्या प्रकल्पांना २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला, असे मत खा. रामदास तडस यांनी व्यक्त केले.कृषी विज्ञान केंद्र सेलसुराद्वारे संकल्प से सिद्धी हा २०२२ पर्यंत न्यू इंडिया मंथन कार्यक्रम नगर भवनात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. कृषी पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे तर अतिथी म्हणून पं.स. सभापती विद्या भुजाडे, नगराध्यक्ष सुचिता मडावी, यवतमाळचे कृषी संशोधन संचालक डॉ. चंद्रकांत पाटील, अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, गोविंद मोरे सांगली, उपविभागीय कृषी अधिकारी जी.आर. कापसे, मधुमक्षिका विकास केंद्राचे डॉ. गोपाल पालीवाल, न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर उपस्थित होते.शोषक किडीच्या उच्चाटनासह पांढºया माशीच्या नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाची गरज आहे. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी शेतकºयांना अत्याधुनिक कृषी ज्ञानाची माहिती द्यावी. प्रगतशील शेतकºयांकडून पीक उत्पादनाचे रहस्य जाणून घेत संकल्प से सिद्धी या धाडसी उपक्रमाला पूर्णत्वास नेले पाहिजे, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. माती परिक्षणाचे ७ हजार ५०० हेक्टरचे ध्येय पूर्ण झाले नाही. माती परिक्षणास शेतकºयांना तयार करावे. शेतकरी समृद्ध करण्यासाठी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात कमी खर्चाच्या शेतीवर भर द्यावा, असे भिसे यांनी सांगितले. यावेळी कृषी महा. नागपूर, रामकृष्ण बजाज कृषी महा. पिपरी व सेलसुरा कृषी तंत्रविज्ञानच्या विद्यार्थ्यांना २०१७ ते २०२२ पर्यंतच्या संकल्प से सिद्धीबाबत शपथ देण्यात आली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत उंबरकर यांनी, संचालन प्रा. उज्वला शिरसाट यांनी केले तर आभार डॉ. धनराज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला आर्वीचे तालुका कृषी अधिकारी पी.डी. गुल्हाणे, आष्टीचे प्रमोद पेटकर, सेलूचे बापुराव वाघमारे, समुद्रपूरचे संजय हाडके, हिंगणघाटचे राष्ट्रपाल मेश्राम, वर्धेचे रेहपाडे व शेतकरी उपस्थित होते.