शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

कागदावरच होते सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:30 IST

प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे.

ठळक मुद्देदहेगाव तलावाची दुरवस्था : दुरूस्ती करणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे. या तलावातील एक थेंबही पाणी सिंचनाकरिता वापरले जात नाही, हे वास्तव आहे. पाहणीमध्ये तलावाच्या पाटचºया पूर्णत: बुजल्याचे तथा पाणी सोडण्यासाठी कुणीही येत नसल्याचे उघड झाले.आर्वी उपविभागाचे अधिकारी मुख्यालयी राहत नाही. यामुळे तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून दहेगाव गोंडी तलावाची पाहणी करण्यासाठी कुठलाही अधिकारी आलेला नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तलावाचे पाणी शेतीला मिळतच नसल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. केवळ गुरांना पिण्याकरिता पाण्याची सोय या तलावामुळे झाली आहे. तलावातून काढलेला कालवा पूर्णत: बुजलेला आहे. यामुळे शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. तलावाच्या भिंतीलगत विहीर आहे. यावर व्हॉल्हव बसविण्यात आला आहे. शेतकºयांसाठी पाणी सोडता यावे म्हणून तो व्हॉल्व्ह लावला आहे. सिंचन विभागाचा कर्मचारी तो व्हॉल्व्ह सुरू करून पाणी सोडेल, असा उद्देश होता; पण पाहणीमध्ये चार-पाच वर्षांपासून कुणी व्हॉल्व्हला हातच लावला नसावा, असे दिसते.तलावाची भिंत सध्या जंगल असल्याचाच भास होत आहे. लोखंडाच्या पायºयांवर झुडपांचे साम्राज्य आहे. शिवाय परिसरातील मातीही घसरली आहे. तलावाची भिंत पावसाच्या पाण्यामुळे खचत असल्याचे दिसते. या तलावाने १०० टक्के जलपातळी गाठल्यास दहेगाव (गोंडी) गाव धोक्यात येऊ शकते. याबाबत आर्वी लघु पाटबंधारे विभागाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. तसेच या जलाशयातील पाणी सिंचनासाठी शेतकºयांना देण्याची मागणी आहे.दहेगाव (गोंडी) तलाव धोकादायकमागील कित्येक वर्षांपासून दहेगाव (गोंडी) तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे सद्यास्थितीत हा तलाव धोकादायक ठरत आहे. याबाबत तज्ञांना विचारणा केली असता तलावाची दुरूस्ती आता शक्य नाही. तलाव निर्मितीसाठी जेवढा खर्च लागला होता, तेवढाच खर्च आता दुरूस्तीसाठी करावा लागणार असल्याचे सांगण्यात येते. तलावाच्या मुख्य भिंतीची माती आता खचू लागली असून ही बाब गंभीर आहे.