शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

कागदावरच होते सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 23:30 IST

प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे.

ठळक मुद्देदहेगाव तलावाची दुरवस्था : दुरूस्ती करणेही कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे. या तलावातील एक थेंबही पाणी सिंचनाकरिता वापरले जात नाही, हे वास्तव आहे. पाहणीमध्ये तलावाच्या पाटचºया पूर्णत: बुजल्याचे तथा पाणी सोडण्यासाठी कुणीही येत नसल्याचे उघड झाले.आर्वी उपविभागाचे अधिकारी मुख्यालयी राहत नाही. यामुळे तलावांची स्थिती अत्यंत दयनिय झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून दहेगाव गोंडी तलावाची पाहणी करण्यासाठी कुठलाही अधिकारी आलेला नसल्याची माहिती शेतकºयांनी दिली. तलावाचे पाणी शेतीला मिळतच नसल्याचा आरोपही शेतकºयांनी केला. केवळ गुरांना पिण्याकरिता पाण्याची सोय या तलावामुळे झाली आहे. तलावातून काढलेला कालवा पूर्णत: बुजलेला आहे. यामुळे शेतांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. तलावाच्या भिंतीलगत विहीर आहे. यावर व्हॉल्हव बसविण्यात आला आहे. शेतकºयांसाठी पाणी सोडता यावे म्हणून तो व्हॉल्व्ह लावला आहे. सिंचन विभागाचा कर्मचारी तो व्हॉल्व्ह सुरू करून पाणी सोडेल, असा उद्देश होता; पण पाहणीमध्ये चार-पाच वर्षांपासून कुणी व्हॉल्व्हला हातच लावला नसावा, असे दिसते.तलावाची भिंत सध्या जंगल असल्याचाच भास होत आहे. लोखंडाच्या पायºयांवर झुडपांचे साम्राज्य आहे. शिवाय परिसरातील मातीही घसरली आहे. तलावाची भिंत पावसाच्या पाण्यामुळे खचत असल्याचे दिसते. या तलावाने १०० टक्के जलपातळी गाठल्यास दहेगाव (गोंडी) गाव धोक्यात येऊ शकते. याबाबत आर्वी लघु पाटबंधारे विभागाला कसलेही सोयरसुतक नसल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे. तसेच या जलाशयातील पाणी सिंचनासाठी शेतकºयांना देण्याची मागणी आहे.दहेगाव (गोंडी) तलाव धोकादायकमागील कित्येक वर्षांपासून दहेगाव (गोंडी) तलावाची देखभाल दुरूस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे सद्यास्थितीत हा तलाव धोकादायक ठरत आहे. याबाबत तज्ञांना विचारणा केली असता तलावाची दुरूस्ती आता शक्य नाही. तलाव निर्मितीसाठी जेवढा खर्च लागला होता, तेवढाच खर्च आता दुरूस्तीसाठी करावा लागणार असल्याचे सांगण्यात येते. तलावाच्या मुख्य भिंतीची माती आता खचू लागली असून ही बाब गंभीर आहे.