शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: November 18, 2015 02:13 IST

तालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विजय माहुरे सेलूतालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या घेऊन कर्मचारी पाटबंधारे विभागाकडे जात आहेत; पण त्यांच्याकडे कर्मचारीच नसल्याने त्या सोडविणे कठीण झाले आहे. या विभागात १२३ पदे मंजूर असताना केवळ ३५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण धूरा आहे. तब्बल ८८ पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. सेलू तालुक्यातील बोरधरणपासून असलेला मुख्य कालवा समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर पर्यंत गेला आहे. या कालव्याचे अंतर २० कि.मी आहे. तर ९४ मायनर असलेला कालवा व वितरीका पाहता २१७ कि.मी चे अंतर आहे. या सर्व वितरीकांची साफसफाई व दुरुस्ती करण्याकरिता ३० लाख रुपयांची गरज आहे. मात्र रबी हंगामासाठी कालवा वितरिकांद्वारे प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांन्कडून सेलूच्या संबंधित कार्यालयात समस्याचा डोंगर उभा केला आहे. शेतकऱ्यांना अधिकारी समजावून सांगत असले तरी निवेदनाचा खच आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालवे चौकीदाराची उणीव भासत आहे. बोरधरण शाखेत १, अंतरगाव शाखेत १, केळझर शाखेत १, दहेगाव १ व हिंगणी शाखेत १ असे ४ कालवे चौकीदारावर कारभार सुरू आहे. पाटबंधारे उपविभाग सेलू अंतर्गत बोरधरण, अंतरगाव, केळझर, दहेगाव व हिंगणी शाखेत कर्मचाऱ्याची कमतरता आहे. त्यात उपविभाग सेलू येथे १३ मंजूर पदे असून दोन रिक्त आहे. बोरधरण शाखेत २२ कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना ५ कर्मचारी आहेत तर १७ पदे रिक्त आहेत, अंतरगाव शाखेत २२ पैकी १८ पदे रिक्त, केळझर २२ पैकी १८ रिक्त, दहेगाव २२ पैकी ४ कार्यरत तर हिंगणी शाखेत २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात पाटबंधारे विभागाला अपयश येत आहे. या विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहे.