शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: November 18, 2015 02:13 IST

तालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विजय माहुरे सेलूतालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या घेऊन कर्मचारी पाटबंधारे विभागाकडे जात आहेत; पण त्यांच्याकडे कर्मचारीच नसल्याने त्या सोडविणे कठीण झाले आहे. या विभागात १२३ पदे मंजूर असताना केवळ ३५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण धूरा आहे. तब्बल ८८ पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. सेलू तालुक्यातील बोरधरणपासून असलेला मुख्य कालवा समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर पर्यंत गेला आहे. या कालव्याचे अंतर २० कि.मी आहे. तर ९४ मायनर असलेला कालवा व वितरीका पाहता २१७ कि.मी चे अंतर आहे. या सर्व वितरीकांची साफसफाई व दुरुस्ती करण्याकरिता ३० लाख रुपयांची गरज आहे. मात्र रबी हंगामासाठी कालवा वितरिकांद्वारे प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांन्कडून सेलूच्या संबंधित कार्यालयात समस्याचा डोंगर उभा केला आहे. शेतकऱ्यांना अधिकारी समजावून सांगत असले तरी निवेदनाचा खच आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालवे चौकीदाराची उणीव भासत आहे. बोरधरण शाखेत १, अंतरगाव शाखेत १, केळझर शाखेत १, दहेगाव १ व हिंगणी शाखेत १ असे ४ कालवे चौकीदारावर कारभार सुरू आहे. पाटबंधारे उपविभाग सेलू अंतर्गत बोरधरण, अंतरगाव, केळझर, दहेगाव व हिंगणी शाखेत कर्मचाऱ्याची कमतरता आहे. त्यात उपविभाग सेलू येथे १३ मंजूर पदे असून दोन रिक्त आहे. बोरधरण शाखेत २२ कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना ५ कर्मचारी आहेत तर १७ पदे रिक्त आहेत, अंतरगाव शाखेत २२ पैकी १८ पदे रिक्त, केळझर २२ पैकी १८ रिक्त, दहेगाव २२ पैकी ४ कार्यरत तर हिंगणी शाखेत २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात पाटबंधारे विभागाला अपयश येत आहे. या विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहे.