शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

पाटबंधारे विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

By admin | Updated: November 18, 2015 02:13 IST

तालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विजय माहुरे सेलूतालुक्यातील बोर प्रकल्पांतर्गत वितरिकांना पाणी सोडले आहे. या वितरिकांतील पाणी शेतात जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या घेऊन कर्मचारी पाटबंधारे विभागाकडे जात आहेत; पण त्यांच्याकडे कर्मचारीच नसल्याने त्या सोडविणे कठीण झाले आहे. या विभागात १२३ पदे मंजूर असताना केवळ ३५ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर संपूर्ण धूरा आहे. तब्बल ८८ पदे रिक्त असल्याने कामांचा खोळंबा होत आहे. सेलू तालुक्यातील बोरधरणपासून असलेला मुख्य कालवा समुद्रपूर तालुक्यातील बाबापूर पर्यंत गेला आहे. या कालव्याचे अंतर २० कि.मी आहे. तर ९४ मायनर असलेला कालवा व वितरीका पाहता २१७ कि.मी चे अंतर आहे. या सर्व वितरीकांची साफसफाई व दुरुस्ती करण्याकरिता ३० लाख रुपयांची गरज आहे. मात्र रबी हंगामासाठी कालवा वितरिकांद्वारे प्रकल्पातून पाणी सोडल्यानंतर शेतकऱ्यांन्कडून सेलूच्या संबंधित कार्यालयात समस्याचा डोंगर उभा केला आहे. शेतकऱ्यांना अधिकारी समजावून सांगत असले तरी निवेदनाचा खच आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी कालवे चौकीदाराची उणीव भासत आहे. बोरधरण शाखेत १, अंतरगाव शाखेत १, केळझर शाखेत १, दहेगाव १ व हिंगणी शाखेत १ असे ४ कालवे चौकीदारावर कारभार सुरू आहे. पाटबंधारे उपविभाग सेलू अंतर्गत बोरधरण, अंतरगाव, केळझर, दहेगाव व हिंगणी शाखेत कर्मचाऱ्याची कमतरता आहे. त्यात उपविभाग सेलू येथे १३ मंजूर पदे असून दोन रिक्त आहे. बोरधरण शाखेत २२ कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना ५ कर्मचारी आहेत तर १७ पदे रिक्त आहेत, अंतरगाव शाखेत २२ पैकी १८ पदे रिक्त, केळझर २२ पैकी १८ रिक्त, दहेगाव २२ पैकी ४ कार्यरत तर हिंगणी शाखेत २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत.कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात पाटबंधारे विभागाला अपयश येत आहे. या विभागातील रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी जोर धरत आहे.