शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणी असूनही सिंचनाची बोंब

By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST

परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी

सेवाग्राम : परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी असूनही सिंचनाची बोंब, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाकाली व बोरधरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सेवाग्रामा भागात धाम मुख्य कालवा गेला आहे. या कालव्याद्वारे पिके ओलिताखाली आली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला दुबार पीक घेणे शक्य झाले आहे. परंतु गत काही काळापासून या कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्या आहेत. या कारणाने सिंचन करताना अर्धेअधिक पाणी वाया जाते. सदर कालवा अंबानगर, कुटीकी फाटा, खरांगणा (गोडे), शिवनगर, हमदापूर आदी भागातून जातो. परंतु यातील अनेक भागात सध्या कालव्याचे पाणीच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या भगातील शेतकरी वर्गाला ओलित कसे करावे असा प्रश्न पडला आहे. याविपरित मधल्या काही भागात कालव्यात झुडुपे वाढल्याने या भागातील शेतांमध्ये पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. वायगाव, आलगाव, भोसा इ. शिवारात धरणाचे पाणी पोहोचतच नसल्याची ओरड य भागातील शेतकरी करीत आहे. हमदापूर येथे नाल्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. येथे पाणीही मुबलक आहे. पण या बंधाऱ्यातून काढण्यात आलेल्या पाटसऱ्या जागोजागी फुटल्याने सर्वत्र पाणी वाया जात आहे. आलगाव फाटा, खरांगणा व शिवनगर आदी क्षेत्रातही हीच पाणी असूनही सिंचनाची बोंब अशी स्थिती आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)