शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पाणी असूनही सिंचनाची बोंब

By admin | Updated: February 2, 2015 23:11 IST

परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी

सेवाग्राम : परिसरात धाम मुख्य कालव्याद्वारे सिंचनाची सोय करण्यात आली आहे. सिंचनासाठी पाणीही उपलब्ध आहे. परंतु अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्याने तसेच कालव्यात झुडपी वाढल्याने पाणी असूनही सिंचनाची बोंब, अशी स्थिती निर्माण झाली आहे. महाकाली व बोरधरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बरेच क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सेवाग्रामा भागात धाम मुख्य कालवा गेला आहे. या कालव्याद्वारे पिके ओलिताखाली आली आहेत. त्यामुळे या भागातील शेतकरी वर्गाला दुबार पीक घेणे शक्य झाले आहे. परंतु गत काही काळापासून या कालव्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी पाटसऱ्या बुजल्या आहेत. या कारणाने सिंचन करताना अर्धेअधिक पाणी वाया जाते. सदर कालवा अंबानगर, कुटीकी फाटा, खरांगणा (गोडे), शिवनगर, हमदापूर आदी भागातून जातो. परंतु यातील अनेक भागात सध्या कालव्याचे पाणीच पोहोचत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या भगातील शेतकरी वर्गाला ओलित कसे करावे असा प्रश्न पडला आहे. याविपरित मधल्या काही भागात कालव्यात झुडुपे वाढल्याने या भागातील शेतांमध्ये पाणी साचत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. वायगाव, आलगाव, भोसा इ. शिवारात धरणाचे पाणी पोहोचतच नसल्याची ओरड य भागातील शेतकरी करीत आहे. हमदापूर येथे नाल्यावर बंधारा बांधण्यात आला आहे. येथे पाणीही मुबलक आहे. पण या बंधाऱ्यातून काढण्यात आलेल्या पाटसऱ्या जागोजागी फुटल्याने सर्वत्र पाणी वाया जात आहे. आलगाव फाटा, खरांगणा व शिवनगर आदी क्षेत्रातही हीच पाणी असूनही सिंचनाची बोंब अशी स्थिती आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)