शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

वसतिगृहातील आहारामध्ये अनियमितता

By admin | Updated: September 22, 2014 23:24 IST

जिल्ह्यात सुमारे १३ आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे आहेत. यात अंदाजे १ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेतात़ सर्वच शासकीय वसतिगृहातील आहाराची

वर्धा : जिल्ह्यात सुमारे १३ आदिवासी मुला-मुलींची शासकीय वसतिगृहे आहेत. यात अंदाजे १ हजार ५०० आदिवासी विद्यार्थी आई-वडिलांपासून दूर राहून शिक्षण घेतात़ सर्वच शासकीय वसतिगृहातील आहाराची व्यवस्था कंत्राट पद्धतीने करण्यात आली़ यात आहारामध्ये अनियमितता होत असल्याचा आरोप आदिवासी संघटनेने केला आहे़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़राजकीय वरदहस्त असलेल्या कंत्राटदारांना वसतिगृहातील आहाराचे कंत्राट दिले जात आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना दैनंदिन आहार शासन निर्णयाप्रमाणे दिला जात नाही. गरीब आदिवासींच्या मुलांच्या दररोजच्या जेवणातील घास चोरला जातो़ असे कृत्य करणाऱ्यांवर शासनाने गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही अवचित सयाम यांनी केली आहे़ शासन निर्णयानुसार आदिवासी वसतिगृहातील मुलांना दररोजचा व आठवड्याचा आहार नियमानुसार पुरवठा करणे अपेक्षित आहे. दररोज शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजनात गहु, बाजरी, ज्वारी, तांदुळ, डाळ, भाजीपाला आदी वस्तूंचा पुरवठा अमर्यादित करण्यात यावा. अल्पोपहारात विद्यार्थ्यांना उसळ, पोहे, उपमा, शिरा यापैकी एक, दूध २५० मिली (साखरेसह), उकडलेली दोन अंडी दररोज, शाकाहारी मुलांसाठी कॉर्न प्लेक्स (सिरीअल) प्रत्येक दिवशी एक, सफरचंद व ऋतुमानाप्रमाणे मिळणारे एक फळ देणे बंधनकारक आहे़ शाकाहारी विद्यार्थी प्रत्येक वेळी दोन भाजी, वरण, दही व भात, एक गोड पदार्थ आठवड्यातून दोन वेळा, दररोजच्या प्रत्येक जेवणात कांदा, लिंबू, लोणचे, पापड, सलाड व ५० ग्रॅम गावरान तूप देणे बंधनकारक आहे़ असे असताना यात कुचराई केली जात असल्याचेच दिसून येत आहे़आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आहारावर शासन निर्णयाप्रमाणे खर्च करण्यास सांगितले जाते़ आदिवासींची मुले-मुली जंगलातून येऊन शहरात खोली करून शिक्षण घेऊ शकत नाहीत. ते कुपोषित राहू नये, भारतीय राज्य घटनेच्या कलम ४६ प्रमाणे त्यांचे शैक्षणिक बाबीचे संरक्षण त्यांना मिळावे व अन्य समाजाप्रमाणे शिक्षणामध्ये त्यांची प्रगती व्हावी या उदात्त हेतूने शासन आदिवासींच्या मुलांची काळजी घेते़ एवढा त्यांच्या आहारावरचा खर्च शासन करीत असतानी त्यांना तो आहार व्यवस्थित मिळतो की नाही, याची तपासणी केली जात नाही़ यामुळे समाज सुधारक, आदिवासी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वसतिगृहांना भेटी देऊन चौकशी करावी, अशी मागणी अवचित सयाम यांनी केली आहे़ विद्यार्थ्यांच्या आहारात कुचराई करणाऱ्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या शासनाकडे तक्रारी करीत कंत्राट रद्द करावे, अशी मागणीही निवेदनातून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)