शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

वीजचोरांवर आयआर मीटरचा वचक

By admin | Updated: June 29, 2015 02:29 IST

वीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात.

जिल्ह्यात लावले ७५ हजार मीटर : अचूक रिडींगकरिता उपयुक्तश्रेया केने  वर्धावीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात. यामुळे देयक कमी होते. यात महावितरणला नुकसान सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी घरोघरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार मीटर बसविण्यात आले आहे. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जातात. तरीही वीज चोरी व विजेचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे हा प्रयोग जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्यावतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर एक एक युनिट वीज वापरल्याचे ग्राह्य धरले जात होते. त्यानुसार ग्राहकांना वीज देयक दिले जात होते. यांत्रिकी पद्धतीवर आधारित या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होेते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी क्लृप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा फटका महावितरणला सहन करावा लागत असल्याने जुने मीटर काढून रिडींगमध्ये पारदर्शक मीटर लावले आहेत. या मीटरमध्ये सुद्धा हेराफेरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्यानंतर रिडींग घेण्यासाठी फोटो पद्धती अंमलात आणली. मात्र यावरही वीज चोरीचे प्रमाण थांबले नाही. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. महावितरणकडून गत दोन वर्षांत ७५ हजार मीटर लावण्यात आले. यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी या शहरी भागात याची अंमलबजावणी करण्यात आली. यासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले आहेत. पुढील काही वर्षांत जिल्हाभरातील ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. इन्फ्रारेड मीटरमध्ये फेरफार करणे शक्य होत असल्याने रिडींग अचूक मिळण्याची शक्यता असते. यामुळे वीज वापराऐवढे देयक देऊन आर्थिक तुट सोसावी लागत नाही. या मीटरची उपलब्धता वेळेवर होत नसल्याने मीटर बसविण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागते.नवीन जोडणीच्यावेळी आयआर मीटर बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. पथकाला तपासणी करताना जुने मीटर लावलेले आढळल्यास आयआर मीटर लावले जाते. याशिवाय अनेक जुने मीटर बदलवून करण्यात आले. तरीही मीटरची अनुपलब्धता असल्याने प्रतीक्षा करावी लागते.मुख्यालयाच्या आदेशानुसार इलेक्ट्रोमेकॅनिकल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चक्रीमीटर बाद झाले असून नवीन जोडणी करताना आयआर मीटर देण्यात येते. ग्रामीण भागात आजही चक्री मीटर आहेत. याला बदलविण्यासाठी या मोहिमेत कार्य होणार आहे.