जिल्ह्यात लावले ७५ हजार मीटर : अचूक रिडींगकरिता उपयुक्तश्रेया केने वर्धावीज वितरण कंपनीला वीज चोरीमुळे फटका सहन करावा लागतो. अनेकदा ग्राहकांकडून मीटरमध्ये तांत्रिक बिघाड करून रिडींग कमी करण्याचे प्रकार घडतात. यामुळे देयक कमी होते. यात महावितरणला नुकसान सोसावे लागते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी घरोघरी इन्फ्रारेड मीटर लावण्याची मोहीम सुरू करण्यात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७५ हजार मीटर बसविण्यात आले आहे. वीज चोरीवर आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीच्यावतीने विविध उपाययोजना आखल्या जातात. तरीही वीज चोरी व विजेचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे हा प्रयोग जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्यावतीने विद्युत ग्राहकांच्या घरी चुंबकीय तत्वावर आधारित वीज मीटर लावण्यात आले होते. या मिटरमध्ये असलेली चक्री विशिष्ट वेळ फिरल्यानंतर एक एक युनिट वीज वापरल्याचे ग्राह्य धरले जात होते. त्यानुसार ग्राहकांना वीज देयक दिले जात होते. यांत्रिकी पद्धतीवर आधारित या वीज मीटरमध्ये हेराफेरी करण्याचे प्रमाण वाढले होेते. विद्युत मंडळाचे सील लावले जात असले, तरी क्लृप्त्या वापरून वीज मीटरमध्ये हेराफेरी होत असल्याचे प्रकार समोर आले आहे. याचा फटका महावितरणला सहन करावा लागत असल्याने जुने मीटर काढून रिडींगमध्ये पारदर्शक मीटर लावले आहेत. या मीटरमध्ये सुद्धा हेराफेरी होत असल्याचे महावितरण कंपनीच्या निदर्शनास आले. त्यानंतर रिडींग घेण्यासाठी फोटो पद्धती अंमलात आणली. मात्र यावरही वीज चोरीचे प्रमाण थांबले नाही. त्यामुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे. महावितरणकडून गत दोन वर्षांत ७५ हजार मीटर लावण्यात आले. यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट, आर्वी या शहरी भागात याची अंमलबजावणी करण्यात आली. यासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या घरी इन्फ्रारेड मीटर लावण्यात आले आहेत. पुढील काही वर्षांत जिल्हाभरातील ग्राहकांकडे हे मीटर लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. इन्फ्रारेड मीटरमध्ये फेरफार करणे शक्य होत असल्याने रिडींग अचूक मिळण्याची शक्यता असते. यामुळे वीज वापराऐवढे देयक देऊन आर्थिक तुट सोसावी लागत नाही. या मीटरची उपलब्धता वेळेवर होत नसल्याने मीटर बसविण्याचे काम टप्प्याटप्प्याने करावे लागते.नवीन जोडणीच्यावेळी आयआर मीटर बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. पथकाला तपासणी करताना जुने मीटर लावलेले आढळल्यास आयआर मीटर लावले जाते. याशिवाय अनेक जुने मीटर बदलवून करण्यात आले. तरीही मीटरची अनुपलब्धता असल्याने प्रतीक्षा करावी लागते.मुख्यालयाच्या आदेशानुसार इलेक्ट्रोमेकॅनिकल बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे चक्रीमीटर बाद झाले असून नवीन जोडणी करताना आयआर मीटर देण्यात येते. ग्रामीण भागात आजही चक्री मीटर आहेत. याला बदलविण्यासाठी या मोहिमेत कार्य होणार आहे.
वीजचोरांवर आयआर मीटरचा वचक
By admin | Updated: June 29, 2015 02:29 IST