शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

‘त्या’ सळाखी देताहेत मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उड्डाणपुलाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देआचार्य विनोबा भावे उड्डाणपूल : खड्ड्यांनी विणले जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काम करताना संबंधित कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा केला जात आहे. बोरगाव (मेघे)कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंत तोडण्यात आली. मात्र, त्यातून बाहेर निघालेल्या सळाखी मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. याकडे कंत्राटदार आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे.शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उड्डाणपुलाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे. यातच कंत्राटदार आणि संबंधित एजन्सीकडून निष्काळजीपणा केला जात असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरून हिंगणघाट, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, देवळीकडे जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. उड्डाणपुलाचे नव्याने बांधकाम सुरू असताना दुसरीकडे पुलावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. उड्डाणपुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असतानाच जुन्या उड्डाणपुलाच्या तोडकामातील सळाखी बाहेर डोकावत असून मृत्यूला आमंत्रण देणाºया ठरत आहेत.कंत्राटदाराचा निष्काळजीपणाकृषी उत्पन्न बाजार समिती, वीज महावितरण कार्यालय, फार्मसी महाविद्यालय, सावंगी रुग्णालयात जाण्याकरिता रुग्ण, नागरिक आणि नोकरदारांना याच उड्डाणपुलावरून जावे लागते. उड्डाणपुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. यातच कंत्राटदाराकडून केला जात असलेला निष्काळजीपणा गंभीर बाब ठरत आहे. पुलाचे बहुतां काम पूर्णत्वास गेले आहे. बोरगाव (मेघे) कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीचे तोडकाम सुरू आहे. मागील कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. बाहेर आलेल्या सळाखी वाहतुकीकरिता धोकादायक ठरत आहेत. सळाखीमध्ये अडकून वाहनचालकांना मोठा अपघात होऊ शकतो.जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने नव्याने उड्डाणपुलाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून केले जात आहे. जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. दुचाकीचालकांना येथून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. खड्ड्यांमुळे अनेकवार चारचाकी वाहने नादुरुस्त होतात. परिणामी वाहतूक ठप्प होते आणि बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग