शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सळाखी देताहेत मृत्यूला आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उड्डाणपुलाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे.

ठळक मुद्देआचार्य विनोबा भावे उड्डाणपूल : खड्ड्यांनी विणले जाळे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काम करताना संबंधित कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा केला जात आहे. बोरगाव (मेघे)कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंत तोडण्यात आली. मात्र, त्यातून बाहेर निघालेल्या सळाखी मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. याकडे कंत्राटदार आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे.शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उड्डाणपुलाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे. यातच कंत्राटदार आणि संबंधित एजन्सीकडून निष्काळजीपणा केला जात असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरून हिंगणघाट, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, देवळीकडे जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. उड्डाणपुलाचे नव्याने बांधकाम सुरू असताना दुसरीकडे पुलावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. उड्डाणपुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असतानाच जुन्या उड्डाणपुलाच्या तोडकामातील सळाखी बाहेर डोकावत असून मृत्यूला आमंत्रण देणाºया ठरत आहेत.कंत्राटदाराचा निष्काळजीपणाकृषी उत्पन्न बाजार समिती, वीज महावितरण कार्यालय, फार्मसी महाविद्यालय, सावंगी रुग्णालयात जाण्याकरिता रुग्ण, नागरिक आणि नोकरदारांना याच उड्डाणपुलावरून जावे लागते. उड्डाणपुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. यातच कंत्राटदाराकडून केला जात असलेला निष्काळजीपणा गंभीर बाब ठरत आहे. पुलाचे बहुतां काम पूर्णत्वास गेले आहे. बोरगाव (मेघे) कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीचे तोडकाम सुरू आहे. मागील कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. बाहेर आलेल्या सळाखी वाहतुकीकरिता धोकादायक ठरत आहेत. सळाखीमध्ये अडकून वाहनचालकांना मोठा अपघात होऊ शकतो.जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने नव्याने उड्डाणपुलाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून केले जात आहे. जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. दुचाकीचालकांना येथून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. खड्ड्यांमुळे अनेकवार चारचाकी वाहने नादुरुस्त होतात. परिणामी वाहतूक ठप्प होते आणि बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग