शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या खचलेल्या कडा अपघातास निमंत्रण

By admin | Updated: April 15, 2017 00:30 IST

रस्त्यावर खड्डे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वर्धा ते नागपूर ...

राज्य महामार्गावरील प्रकार : कडा भरण्याची मागणी सेलू : रस्त्यावर खड्डे हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे प्रवासी व वाहन धारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वर्धा ते नागपूर या राज्यमार्गावरील कडा खचल्या असून ही बाब अपघाताला निमंत्रण देणारी ठरत आहे. बोरनदी पुलाच्या परिसरात रस्त्याच्या कडा खोलगट असल्याने तेथे भरावा देण्याची मागणी होत आहे. या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतूक व प्रवासी वाहतूक होते. दिवसाला हजारो वाहने या रस्त्याने धावतात. त्यातच रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. या मार्गावरील वाहनांची वर्दळ पाहता प्रसंगी वाहन रस्त्याच्या खाली उतरावे लागल्यास अपघाताचा धोका असतो. रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत हा रस्ता येतो. मात्र रस्त्याच्या कडा त्यांच्या नजरेतून सुटल्या कशा असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करतात. रस्ता चांगला असावा, रस्त्याने जाताना वाहनधारकांना अडचण जाणार नाही, वाहतूक सुरळीत राहावी, अपघात घडू नये याची काळजी घेण्याची गरज असताना या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. डांबरीकरणाच्या बाजूला मुरूम टाकण्याची आवश्यकता असताना कडा भरण्यात आल्या नसून अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.(शहर प्रतिनिधी) बोरनदीच्या पुलावरील दोन्ही बाजुच्या कडा भरण्यात आल्या माही. त्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकाला प्रसंगी वाहन रस्त्याच्या खाली घायचे असल्यास कोणताच पर्याय नाही. रस्त्याच्या बाजू खोलगट असल्याने वाहन धारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. कधीतर वाहन ओव्हरटेक करताना अंदाज झाला नाही तर अपघाताला निमत्रण मिळते. रस्त्याच्या डागडूजीवर लाखो रूपये खर्च करणाऱ्या प्रशासनाला रस्त्याच्या कडा भरण्याचा आजवर विसर पडल्याचे दिसते. कडा भरण्याकरिता लागणारा खर्च करणे शासनाला अवघड आहे काय, असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होतो. येथे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने संबंधीत विभागाने याकडे त्वरीत लक्ष देत रस्त्याच्या कडा भरण्याची गरज व्यक्त होत आहे.