शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा देताहेत मृत्यूला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:12 IST

कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे.

ठळक मुद्देमहावितरणचे तक्रारीकडे दुर्लक्ष : समस्या सोडविण्याची गावकऱ्यांची मागणी

आॅनलाईन लोकमतकेळझर : कपाशी व तुरीच्या पिकांवर विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांसह कापूस वेचणाऱ्या मजुरांचा जीव धोक्यात सापडला आहे. याबाबत अनेकदा महावितरणकडे संबंधित शेतकऱ्याने तक्रारी केल्या; परंतु त्या तक्रारीची अधिकारी, कर्मचारी वर्गाने दखलच घेतली नाही. या जिवंत तारांचा करंट लागून एखाद्याचा जीव गेल्यानंतर महावितरणाला जाग येईल का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.आमगाव (खडकी) येथील शेतकरी अमोल जांबुतकर यांचे मौजा आमगाव येथे शेत आहे. सध्या या शेतात कपाशी व तुरीचे पीक आहे. त्यांच्या शेतात विद्युत खांबावरील जिवंत वीज तारा लोंबकळून तुरीच्या झाडांना लागलेल्या आहे. हाताने पकडणे शक्य होईल इतक्या खाली या वीज तारा आल्या आहेत. शेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. नाल्यातील रसायनयुक्त पाण्याच्या प्रकरणी सेलूचे तहसीलदारांनी गावात भेटीदरम्यान पाहणी केली असता ग्रामस्थांनी ही बाब त्यांच्याही निदर्शनास आणून दिली, हे विशेष. तरी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अनुचित प्रकार घडण्याआधी याकडे लक्ष देत जांबुतकर यांच्या शेतातील लोंबकळणाऱ्या विद्युत तारांना सरळ करण्याची मागणी आमगावच्या ग्रामस्थांनी केली आहे. याकडे दुर्लक्ष करून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी महावितरणवर राहील असे सांगण्यात आले आहे.अनवधानाने स्पर्श झाल्यास अपघाताचा धोकाशेतात सध्या कपाशी वेचाई सुरू असल्याने मजुरांचा जीव धोक्यात आला आहे. अनावधानाने जर एखाद्या मजुराच्या हाताचा स्पर्श या लोंबकळणाऱ्या जिवंत ताराला झाला तर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच भीतीने शेतकऱ्यांसह शेतमजुरीही धास्तावले आहेत. अनेकदा मजूर शेतात येण्यास धजावत नाही अशी व्यस्था शेतकरी मांडतात.