शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: May 30, 2017 01:08 IST

सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

शेतीची कामे करताना अडचण : वीज खांबांना ताण देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शेतशिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सेलू शिवारातील शेत सर्व्हे नं. २५६ मध्ये गत काही महिन्यांपासून विद्युत तारा लोंबकळत आहे. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करताना त्या तारा अडचणीच्या ठरत आहे. अनेक वेळा शेतकरी अनिल काटोले यांनी वीज वितरण कार्यालयाला कळविले असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या जिवंत तारा अपघातास कारणीभुत ठरण्याचा धोका अधिक आहे. शेतात काम करताना शेतकरी मजूर जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.असाच प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. शेतातील तक्रारीचा निपटारा करण्यास टाळाटाळ का केली जाते हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. बहुतांश ठिकाणी नवीन वीज जोडणीला सिमेंटचे खांब वापरले जात आहे. हे खांब काही ठिकाणी जमिनीला टेकत आहे. तर कुठे तारांच्या आधारे उभे आहे. शेतात दिवसाची रात्र करणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीचे ठरू पाहत आहे. अनिल काटोले यांचे शेतातून वडगावकडे वीज पुरवठा करणारे खांब गेले आहे. त्यामुळे वीज खांबांना तंगावा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकाचे नुकसान होवू नये तसेच वारागर्दीमुळे तार तुटल्यास अपघात घडू नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी अनिल काटोले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. याची दखल घेत त्वरीत उपाययओजना करण्याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. वीजखांब वाकल्याने तारा लोंबकळल्या सेवाग्राम : आदर्श नगर येथील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळल्या आहे. पाऊस व वादळामुळे लोंबकळ्त्या तारांमध्ये घर्षण होऊन धोक्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.सेवाग्राम-वर्धा मार्गावर असलेल्या आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुचा खांब वाकला आहे. शिवाय काही तारा खाली लोंबकळत आहे. वाकलेल्या वीज खांबाला तंगाव्याचा आधार नाही. यामुळे आदर्शनगर वसाहत आणि हुतात्मा स्मारकाकडे गेलेल्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहे. येथील वीज जोडणी जुनी आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्याने उंची वाढली आहे. परिणामी रस्ता आणि वीजतारा यातील अंतर कमी झाले आहे. वाहन चालकांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे. वादळामुळे येथे अपघताची शक्यता निर्माण झाली आहे. येथील धोका लक्षात घेता वाकलेला वीज खांब व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.