शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणाऱ्या वीजतारा देतात अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: May 30, 2017 01:08 IST

सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो.

शेतीची कामे करताना अडचण : वीज खांबांना ताण देण्याची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सध्या शेतीच्या मशागतीचे कामे अंतिमटप्प्यात आहे. मात्र शेतातून जाणाऱ्या वीज तारांमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. शेतशिवारात लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.सेलू शिवारातील शेत सर्व्हे नं. २५६ मध्ये गत काही महिन्यांपासून विद्युत तारा लोंबकळत आहे. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करताना त्या तारा अडचणीच्या ठरत आहे. अनेक वेळा शेतकरी अनिल काटोले यांनी वीज वितरण कार्यालयाला कळविले असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या जिवंत तारा अपघातास कारणीभुत ठरण्याचा धोका अधिक आहे. शेतात काम करताना शेतकरी मजूर जीव मुठीत घेऊन काम करीत आहे.असाच प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. शेतातील तक्रारीचा निपटारा करण्यास टाळाटाळ का केली जाते हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. बहुतांश ठिकाणी नवीन वीज जोडणीला सिमेंटचे खांब वापरले जात आहे. हे खांब काही ठिकाणी जमिनीला टेकत आहे. तर कुठे तारांच्या आधारे उभे आहे. शेतात दिवसाची रात्र करणाऱ्या शेतकऱ्याला अडचणीचे ठरू पाहत आहे. अनिल काटोले यांचे शेतातून वडगावकडे वीज पुरवठा करणारे खांब गेले आहे. त्यामुळे वीज खांबांना तंगावा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकाचे नुकसान होवू नये तसेच वारागर्दीमुळे तार तुटल्यास अपघात घडू नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी अनिल काटोले तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे. याची दखल घेत त्वरीत उपाययओजना करण्याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे. वीजखांब वाकल्याने तारा लोंबकळल्या सेवाग्राम : आदर्श नगर येथील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळल्या आहे. पाऊस व वादळामुळे लोंबकळ्त्या तारांमध्ये घर्षण होऊन धोक्याची शक्यता आहे. वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.सेवाग्राम-वर्धा मार्गावर असलेल्या आदर्शनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुचा खांब वाकला आहे. शिवाय काही तारा खाली लोंबकळत आहे. वाकलेल्या वीज खांबाला तंगाव्याचा आधार नाही. यामुळे आदर्शनगर वसाहत आणि हुतात्मा स्मारकाकडे गेलेल्या वीज तारा लोंबकळलेल्या स्थितीत आहे. येथील वीज जोडणी जुनी आहे. रस्त्याचे बांधकाम झाल्याने उंची वाढली आहे. परिणामी रस्ता आणि वीजतारा यातील अंतर कमी झाले आहे. वाहन चालकांसाठी ही बाब धोकादायक ठरत आहे. वादळामुळे येथे अपघताची शक्यता निर्माण झाली आहे. येथील धोका लक्षात घेता वाकलेला वीज खांब व्यवस्थित करण्याची मागणी होत आहे.