शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भूदानातील शेतजमिनीच्या घोटाळ्याची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 22:34 IST

जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत.

ठळक मुद्देरामदास तडस यांनी संसदेत मांडला मुद्दा : केंद्रीय गृहमंत्र्यांचे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये १९८० हेक्टर जमीन भूदानातील असून त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झालेले नाही. अलीकडच्या काळात भूदान गरिबांना न देता त्या जमिनी धनदांडगे व शिक्षण संस्थाधारकांना वितरित झाल्या आहे. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भूखंड पाडल्याची प्रकरणे उजेडात येत आहेत. विनोबा भावे यांनी भूदान चळवळीमध्ये जी शेतजमीन मिळविली, त्यातील काही जमीन गरजूंना देण्यात आली; परंतु शेती करण्याचे भान त्यापैकी अनेकांना नसल्यामुळे या जमिनी तशाच पडून होत्या. शिल्लक जमिनी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थेच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डर व संस्थांना विकण्यात आल्या आहे. सर्व भूदानातील जमिनी देशातील भूमिहीन गोरगरिब तसेच सरकारी कार्याकरिता मिळावी खासदार रामदास तडस यांनी शेतजमिनीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी याकरीता लोकसभेत शून्य प्रहरांतर्गत प्रश्न उपस्थित केला.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीचा प्रारंभ वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाग्राम येथून ७ मार्च २०१५ ला व आंध्र प्रदेशातील शिवरामपल्ली आजच्या तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, उडिशा व महाराष्ट्र या सर्व राज्यात भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यात त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला.यावेळी आचार्य विनोबा भावे यांनी ४० हजार मैल पायदळ यात्रा करून २२.९० लाख जमीन भूदानामध्ये संग्रह करण्यात आली. ते ऐतिहासिक कार्य होते. या चळवळीतून जमा झालेल्या जमिनीतून देशातील १६.६६ लाख एकर जमीन भूमिहिनांना देण्यात आली. या जमिनीपैकी ६.२७ लाख एकर जमीन संस्थांकडे शिल्लक राहिली. भूदान मधील शिल्लक असलेल्या जमिनी अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्थांच्या संगनमताने श्रीमंत, बिल्डर आणि संस्थांना विकण्यात आल्या आहेत. या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी गृहमंत्री यांच्याकडे लोकसभेत शून्य प्रहरात केली.आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीच्या माध्यमातून गोरगरिबांना जमीन मिळावी याकरिता प्रयत्न केले. परंतु, त्यांनी केलेल्या या कार्याला अधिकारी, भूमाफिया व शैक्षणिक संस्था यांनी भ्रष्टाचार करून स्वत:च्या फायद्याकरिता जमिनीचा उपयोग केला. या भ्रष्टाचाराची चौकशी झाल्यास अनेक प्रकरणे बाहेर येऊन भूदानमधील जमीन गोरगरिबांना व सरकारी कार्याकरिता उपयोग होईल, असा विश्वास यावेळी खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस