शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

वाढीव वीज बिलाची चौकशी करा

By admin | Updated: July 2, 2014 23:25 IST

येथील कृषी पंप धारकांना मिटरचे रिडींग न घेता बिल देयके देण्यात येत आहे. याबाबत आर्वीचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेवून निवेदन सादर केले होते.

वर्धमनेरी : येथील कृषी पंप धारकांना मिटरचे रिडींग न घेता बिल देयके देण्यात येत आहे. याबाबत आर्वीचे कार्यकारी अभियंता गायकवाड यांना दोन महिन्यांपूर्वी ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी घेवून निवेदन सादर केले होते. चर्चासुद्धा करण्यात आली होती. रिडींग घेवून बिलाची दुरूस्ती करून देऊ, अशी ग्वाही गायकवाड यांनी दिली होती. मात्र देयके आली तेव्हा सरसकट सर्व कृषी पंपधारकांना ११४० युनिट दाखवून देयके देण्यात आल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.तीन ते चार वर्षांपासून रिडिंग न घेता बिल देण्यात येत आहे. प्रत्येक बिलात १००० ते २००० युनिट दाखविण्यात येत आहे. रिडींग घेवून बिलाची दुरूस्ती केली तर २५ टक्के इतकेच बिलात रक्कम येऊ शकते. याबाबत वेळोवेळी माहिती देऊनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहे, उर्जा मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालून चौकशी करण्यात यावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी कृषीपंपधारकाची मागणी आहे. घरगुती चालू बिलाची रक्कम भरण्यास आठ दिवस उशिर झाला तर विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी भाड्याच्या गाडीने आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा ताफा गावात येतात. विद्युत पुरवठा खंडित करण्याकरिता वर्धामनेरी, खानवाडी, मांडला, जळगाव, परतोडा या परिसरात फिरुन घरगुती विद्युत पुरवठा खंडित करतात. वीज पुरवठा खंडित करण्याकरिता कंपनीजवळ कर्मचारी उपलब्ध आहे, पण कृषी पंपाचे रिडींग घेण्याकरिता व बिलात दुुरूस्त करण्याकरिता कंपनीजवळ कर्मचारी मात्र उपलब्ध नाही, अशी स्थिती आहे.विचारणा केली, तर कृषी संजिवनीचा फायदा घ्या, असे सांगण्यात येत आहे. सर्व कृषी पंपधारकांकडे ३ एचपी पॉवरच्या मोटारी असताना बिलात मात्र पाच एच पीच्या मोटारी दाखवून बिल काढण्यात येत आहे. राज्य शासनाच्या संबंधित खात्याने योग्य चौकशी करून शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी पंपाचे बिल योग्य रिडींग घेऊन दिले तर ७००० कोटी रुपयांची रक्कम २००० कोटींवर येवू शकते. एकीकडे निसर्ग साथ देत नाही. सध्या शेतकरी विवंचनेत सापडला आहे. बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. नाईलाजास्तव सावकरापासून पैसे घेऊन कसे तरी बियाने खरेदी करीत आहे. विद्युत वितरण कंपनी कृषीधारकांची जास्तीचे आकडे घेऊन बोगस बिल देत आहे. यापूर्वी काही पंपधारकांनी २० ते ३० टक्के बिल भरूनसुद्धा बिलात मात्र काहीही दाखविण्यात आले नाही. याची चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)