शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा

By admin | Updated: May 21, 2017 01:06 IST

पीक विमा योजना ही वर्धा जिल्ह्यात विमा कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

निवेदन : मुकेश भिसे यांचे कृषिमंत्र्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पीक विमा योजना ही वर्धा जिल्ह्यात विमा कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पीकनिहाय विमा मोठ्या प्रमाणात काढला; पण त्याचा लाभ त्यांना झाला नाही. याकडे लक्ष देत पीक विमा कंपन्यांची चौकशी करावी, अशी माणगी जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे यांनी केली. याबाबत राज्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हास्तरीय खरीप पीक नियोजन आढावा बैठकीत या प्रश्नांवर आ. समीर कुणावार व इतर पदाधिकाऱ्यांनी माहिती विचारली. यावर पीक विमा कंपन्यांकडील केवळ एका रिलायंस विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२६ प्रकरणांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देय आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात सर्व्हे न करता कृषी सहायकांनी केला. वर्धा जिल्ह्यातून ९६ हजार १७७ शेतकऱ्यांनी सुमारे १४.८६ कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना अदा केला. यातील केवळ २२ शेतकरी पात्र ठरले असून ६ शेतकऱ्यांना ८४ हजार ५७९ रुपये प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यावरून विमा कंपन्या शेतकऱ्यांची कीत लूट करीत आहे, हे दिसून येते. कोणत्याही विमा कंपन्यांचे जिल्हा व तालुका स्थळी कार्यालय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी संपर्क कुणाकडे करावा, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी शहानिशा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांमार्फत होणारी लूट थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही पांडुरंग फुंडकर यांना कृषी सभापती भिसे यांनी केली आहे.