शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

पीक विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करा

By admin | Updated: May 21, 2017 01:06 IST

पीक विमा योजना ही वर्धा जिल्ह्यात विमा कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.

निवेदन : मुकेश भिसे यांचे कृषिमंत्र्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पीक विमा योजना ही वर्धा जिल्ह्यात विमा कंपन्यांमार्फत मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शेतकऱ्यांनी पीकनिहाय विमा मोठ्या प्रमाणात काढला; पण त्याचा लाभ त्यांना झाला नाही. याकडे लक्ष देत पीक विमा कंपन्यांची चौकशी करावी, अशी माणगी जि.प. कृषी सभापती मुकेश भिसे यांनी केली. याबाबत राज्य कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांना निवेदनही सादर करण्यात आले. जिल्हास्तरीय खरीप पीक नियोजन आढावा बैठकीत या प्रश्नांवर आ. समीर कुणावार व इतर पदाधिकाऱ्यांनी माहिती विचारली. यावर पीक विमा कंपन्यांकडील केवळ एका रिलायंस विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील ७२६ प्रकरणांपैकी केवळ २२ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देय आहे. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात सर्व्हे न करता कृषी सहायकांनी केला. वर्धा जिल्ह्यातून ९६ हजार १७७ शेतकऱ्यांनी सुमारे १४.८६ कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना अदा केला. यातील केवळ २२ शेतकरी पात्र ठरले असून ६ शेतकऱ्यांना ८४ हजार ५७९ रुपये प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यावरून विमा कंपन्या शेतकऱ्यांची कीत लूट करीत आहे, हे दिसून येते. कोणत्याही विमा कंपन्यांचे जिल्हा व तालुका स्थळी कार्यालय नाही. यामुळे शेतकऱ्यांनी संपर्क कुणाकडे करावा, हा प्रश्नच आहे. या प्रकरणी शहानिशा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विमा कंपन्यांमार्फत होणारी लूट थांबवावी. शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही पांडुरंग फुंडकर यांना कृषी सभापती भिसे यांनी केली आहे.