शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

मुख्य बाजारातील अतिक्रमण ‘हटाव’

By admin | Updated: February 11, 2016 02:35 IST

शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

२५ हजारांचा दंड : रस्ते मोकळे होण्यास मदत, दिवसभर मात्र वाहतुकीस अडचणवर्धा : शहरातील मुख्य मार्गासह बाजारापेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर मार्ग काढण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. मंगळवारपासून बजाज चौक ते आर्वी नाका तर बुधवारी मुख्य बाजारपेठेत ही मोहीम राबविण्यात आली. बुधवारी २५ ते २६ अतिक्रमणधारकांवर कारवाई करीत त्यांच्यावर २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वर्धा शहरात मुख्य बाजारपेठेत व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यातच चारचाकी बंड्यांवर वस्तूंची विक्री करीत असलेल्यांमुळेही वाहतुकीचा पचका होतो. परिणामी मुख्य बाजारात कामानिमित्त व खरेदीसाठी येत असलेल्या नागरिकांची गैरसोय होते. हीच बाब ध्यानात घेत बुधवारी मुख्य बाजारात पालिका प्रशासनाद्वारे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या कारवाईत जवळपास २५ अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली. यात २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दिवसभर ही मोहीम सुरू होती. त्याचप्रमाणे मंगळवारी मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव कारवाईत एका अतिक्रमणधारकावर हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. तसेच मंगळवारी काही व्यापाऱ्यांनी पालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याने बाजारपेठ परिसरात पोलिसांचा बंदोबस्त होता. त्यामुळे बुधवारी कुठलाही वाद न होता अतिशय शांततेत ही मोहीम सुरू होती. परंतु वाहने रस्त्यावर दिवसभार उभी राहिल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.(शहर प्रतिनिधी)