शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

फलक नसल्याने गतिरोधक देताहेत अपघातास निमंत्रण

By admin | Updated: December 31, 2015 02:24 IST

रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे.

संबंधितांचे दुर्लक्ष : प्रवासी झाले त्रस्तघोराड : रस्ता चांगला असला तरी बहुतांश ठिकाणी गतिरोधक तयार करण्यात आले आहे. पण येथे गतिरोधक आहे असा फलकच पाहावयास मिळत नसल्याने वाहनधारकांना किरकोळ अपघाताला सामोरे जावे लागत आहे.सेलू येथील विकास चौकात घडणारे अपघात पाहता नागरिकांच्या मागणीनुसार वर्धा नागपूर मार्गावर दोन तर हिंगणीकडे जाणाऱ्या मार्गावर एका गतिरोधकाची निर्मिती करण्यात आली. तसेच सेलू पंचायत समितीजवळ, मोही गावाजवळ असे अनेक ठिकाणी गतिरोधक तयार करून भरधाव धावणाऱ्या वाहनाची गती कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.गतिरोधक तयार केल्यावर तिथे गतिरोधक असल्याचा फलक लावणे गरजेचे आहे. असे फलक लावण्याचा मात्र बांधकाम विभागाला विसर पडला आहे. त्यामुळे हे गतिरोधक आता अपघातास कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी या गतीरोधकावर पांढरे पट्टे सुद्धा मारण्यात आलेले नाही. त्यामुळे वेगाने येत असलेल्या वाहनांना गती नियंत्रित करणे शक्य होत नाही. अश्या वेळेस वाहने अनियंत्रित होऊन अपघात होत आहेत. हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. किरकोळ अपघात रोखण्यासाठी रस्त्यावर ज्या ठिकाणी गतिरोधक आहे. अशा ठिकाणी समोरे गतिरोधक असल्याचा फलक लावावा तसेच गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.(वार्ताहर)