शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

राहूल गांधी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:30 IST

पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली.

ठळक मुद्देआर्वी व वर्धेत उमटले पडसाद : दोषींवर कठोर कार्यवाही करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पूर पीडितांची व्यथा समजून घेण्यासाठी गुजरात मध्ये गेलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या गाडीवर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार निंदनिय असून या घटनेतील दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून महिला काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकुमशाहीचा अवलंब करीत असल्याने तसेच भाजपाचीही हुकुमशाही दिवसेंदिवस वाढत असल्याने आम्ही त्याचा निषेध करतो. गुजरात मधील बनासकांठा या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी व नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या उपाध्यक्ष राहूल गांधी यांच्या वाहनावर काहींनी दगडफेक केली. हा प्रकार लोकशाहीचा गळा दाबून त्याची हत्या करणाराच आहे. भारत हा लोकशाही स्वीकारणारा देश असून या घटनेतील आरोपींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्वीकारले. निवेदन देताना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे, सायली वंजारी, जोत्स्रा ढाले, वादाफळे, वानखेडे, मुटे, जया गायधने, नलिनी भोयर, पवार, रंजना पवार, छाया पुरके, कुंदा भोयर, योगीता मानकट आदींची उपस्थिती होती.उपविभागीय अधिकाºयांना निवेदनआर्वी - काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्यावरील भ्याड हल्ला ही लोकशाहीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील हल्लेखोरांवर सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आर्वी शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात मधील बनासकांठा येथे पूरग्रस्तांना भेटण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. राहुल गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी गुजरात राज्य सरकारची असताना राज्य सरकारकडून सुरक्षा व्यवस्थेत जाणिवपूर्वक कमतरता ठेवण्यात आल्याचा आरोप निवदेनातून करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. निवेदन देताना सुधीर वाकोडकर, धनंजय चौबे, बाबाराव अवथळे, मधुकर सोमकुवर, कृष्ण भाकरे, गजानन गावंडे, सचिन वैद्य, अमोल दहाट, अ‍ॅड दीपक मोटवाणी, महादेव निखाडे, रज्जाक अली, भोजराज भोवरे, राजू रत्नपारखी, प्रविण कडू, गंगाधर तायवाडे, पद्माकर मुडे, स्वप्नील कैलुके, प्रविण खोंडे, संजय पडोळे, किशोर सेलोकर, ललित साहु, मिलींद आवते, रवी नाखले, सुनील साळवे, कैलास जैन, टिकाराम चौधरी, चंद्रकांत राऊत, राहुल बोरघडे आदी उपस्थित होते.