शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

महामार्गाच्या कामासाठी अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 05:00 IST

महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.

ठळक मुद्देधोत्रा परिसरातील शेतकरी अडचणीत : मुरुम, मातीचा सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर/वर्धा : समृध्दी महामार्गात अ‍ॅपकॉन कंपनीने मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरूम, माती चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना असाच प्रकार पुन्हा त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या माध्यमातून अल्लीपूर परिसरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हिंगणघाट- वर्धा या महामार्गाचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.या महामार्गाच्या कामासाठी अल्लीपूरपासून ५ कि.मी. अंतरावर धोत्रा गावाजवळ शेतकऱ्यांच्या शेतातील मुरूम व माती मोठ्या प्रमाणावर खोदून नेण्यात येत आहे. शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता त्रिनेवा इन्फ्रा प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने १० फुट खोल खड्डे करून खोदकाम करून माती व मुरूम रस्ता कामासाठी वापरला आहे. हिंगणघाट-वर्धा रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात येत आहे.कंपनीकडून करण्यात आलेल्या या खोदकामामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. स्थानिक प्रशासन या बाबीकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. अनेक भागात मुरूम व माती काढण्यात आल्यामुळे मोठे खड्डे पडले असून शेकडो ट्रकच्या सहाय्याने मुरूम, मातीची वाहतुक केली जात आहे.मुरूम, माती काढल्याने येथे खड्डे निर्माण झाले.त्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा होवून तेथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कंपनीच्या शेकडो वाहनामुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. मात्र कंपनीच्या या सर्व कारभाराला प्रशासनाचा आर्शिवाद असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.यापूर्वी जिल्ह्यात सेलू तालुक्यात अ‍ॅपकॉन कंपनीने अशाच प्रकारे मुरूम, माती अवैधरित्या चोरून नेली होती. याप्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर संबंधीत कंपनीच्या अधिकाºयाचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला आहे.अल्लीपूर भागातील या प्रकरणातही असाच प्रकार झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकºयांची परवानगी न घेताच त्यांचे शेत, परिसरातील रस्त्यालगतची जागा खोदली जात आहे.वर्धा - हिंगणघाट महामार्गाच्या कामात कंत्राटदार कंपनीकडून अवैधरित्या शेतकºयांच्या शेतातील मुरूम, माती काढून नेल्याच्या प्रकरणात अद्याप एकही तक्रार प्रशासनाकडे आलेली नाही. शेतकºयांची तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.- प्रीती डुडुलकर, तहसीलदार वर्धा.

टॅग्स :wardha-acवर्धा