शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

अतिक्रमण काढताना इंटरनेट सेवा विस्कळीत

By admin | Updated: January 23, 2016 02:15 IST

दोन दिवसांपासून आर्वी नाका परिसरात नगर पलिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.

बँका आणि कार्यालयातील व्यवहार ठप्प : वाहतूकदेखील प्रभावित, नागरिकांची कुचंबणावर्धा : दोन दिवसांपासून आर्वी नाका परिसरात नगर पलिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. पण गुरुवारी नाल्यांवरील अतिक्रमण काढताना बीएसएनएलचे केबल वायर तुटल्याने इंटरनेट सेवा खंडित झाली. परिणामी परिसरातील बँक आॅफ इंडियासह इतरही बँक आणि कार्यालयातील सेवा विस्कळीत झाली. बँकांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे व बँकांचे व्यवहारही खोळंबले. व्यवहारच होत नसल्याने या परिसरातील बँक आॅफ इंडिया शाखेचे गेट बंद करून त्यावर लिंक फेल असल्याचा फलक लावण्यात आला. त्यामुळे बँकेच्या बाहेर बराच काळ गर्दी झाली होती. कालपासूनच हे व्यवहार ठप्प झाले आहे. लिंक सुरळीत होण्यात किती कालावधी लागणार हे सांगता येत नसल्याचे बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच इतर शाखेतून व्यवहार सुरू असल्याचीही माहिती दिली. अतिक्रमण काढताना इंटरनेट केबल वायर तुटल्याने बीएसएनएलद्वारे केबल जोडण्याचे कामही सुरू होते. पण जोपर्यंत तुटलेला मुख्य केबल वायर सापडत नाही तोपर्यंत ही सेवा पूर्ववत होणार नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच सदर काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचेही बोलले जात होते. अतिक्रमण काढले जात असल्याने रस्ते मोकळे होत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी नालीवरील रपटे तोडल्याने गैरसोयही होत आहे. तसेच सदर रपटे तोडत असतानाच इंटरनेटचे केबल तुटले आहे. त्यामुळे सदर रपटे तोडण्याची गरज काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहे. या परिसरात अनेक गैरशासकीय कार्यालये व व्यावसायिक आहेत. पण इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने त्यांची कामेही रखडली आहे. शिवाय सेवा पूर्ववत केव्हा सुरू होईल याचा नेम नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. भर दुपारी सदर अतिक्रमण काढण्यात येत असल्याने वाहतूकही विकळीत झाली होती. परंतु पोलीस व्यवस्था चोख असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.(शहर प्रतिनिधी)