शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

अतिक्रमण काढताना इंटरनेट सेवा विस्कळीत

By admin | Updated: January 23, 2016 02:15 IST

दोन दिवसांपासून आर्वी नाका परिसरात नगर पलिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे.

बँका आणि कार्यालयातील व्यवहार ठप्प : वाहतूकदेखील प्रभावित, नागरिकांची कुचंबणावर्धा : दोन दिवसांपासून आर्वी नाका परिसरात नगर पलिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. पण गुरुवारी नाल्यांवरील अतिक्रमण काढताना बीएसएनएलचे केबल वायर तुटल्याने इंटरनेट सेवा खंडित झाली. परिणामी परिसरातील बँक आॅफ इंडियासह इतरही बँक आणि कार्यालयातील सेवा विस्कळीत झाली. बँकांचे कामकाज ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे व बँकांचे व्यवहारही खोळंबले. व्यवहारच होत नसल्याने या परिसरातील बँक आॅफ इंडिया शाखेचे गेट बंद करून त्यावर लिंक फेल असल्याचा फलक लावण्यात आला. त्यामुळे बँकेच्या बाहेर बराच काळ गर्दी झाली होती. कालपासूनच हे व्यवहार ठप्प झाले आहे. लिंक सुरळीत होण्यात किती कालावधी लागणार हे सांगता येत नसल्याचे बँक आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच इतर शाखेतून व्यवहार सुरू असल्याचीही माहिती दिली. अतिक्रमण काढताना इंटरनेट केबल वायर तुटल्याने बीएसएनएलद्वारे केबल जोडण्याचे कामही सुरू होते. पण जोपर्यंत तुटलेला मुख्य केबल वायर सापडत नाही तोपर्यंत ही सेवा पूर्ववत होणार नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच सदर काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचेही बोलले जात होते. अतिक्रमण काढले जात असल्याने रस्ते मोकळे होत आहे. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत असले तरी नालीवरील रपटे तोडल्याने गैरसोयही होत आहे. तसेच सदर रपटे तोडत असतानाच इंटरनेटचे केबल तुटले आहे. त्यामुळे सदर रपटे तोडण्याची गरज काय, असा प्रश्नही नागरिक उपस्थित करीत आहे. या परिसरात अनेक गैरशासकीय कार्यालये व व्यावसायिक आहेत. पण इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने त्यांची कामेही रखडली आहे. शिवाय सेवा पूर्ववत केव्हा सुरू होईल याचा नेम नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत होते. भर दुपारी सदर अतिक्रमण काढण्यात येत असल्याने वाहतूकही विकळीत झाली होती. परंतु पोलीस व्यवस्था चोख असल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.(शहर प्रतिनिधी)