शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

इंटरनेट केबलचे खड्डे धोकादायक

By admin | Updated: October 17, 2016 01:14 IST

संपूर्ण भारतात ग्रामपंचायतींना आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.

खड्ड्यात पडून अनेकांना अपघात : दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा साहूर : संपूर्ण भारतात ग्रामपंचायतींना आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. याच आॅनलाईच्या कामाकरिता साहूर परिसरात केबल टाकण्याकरिता खड्डे खोदण्यात आले. हे खड्डे आज तसेच असून या खड्डयात पडून अनेक अपघात होत आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आॅनलाईन अपघात होत असल्याच्या प्रतिक्रीया गावकऱ्यांकडून मिळत आहे. केबल टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या नाल्या ठेकेदाराने व्यवस्थती बुजविल्या नसल्याने येथे मोठ मोठे खड्डे कायम आहे. साहुरचे डॉ. प्रभाकर यांनी ठेकेदाराच्या जेसीबी चालविणाऱ्या कामागारांना नाल्या बुजविण्यासाठी हटकले, त्यांनी ठेकेदाराचा रस्ता रोकला. यावेळी ठेकेदराने नाल्या बुजविण्याचे आश्वासन दिले. आश्वासन देवून बेपत्ता झालेला ठेकेदार येथे अद्याप परत आला नसल्याने खड्डे आहे त्याच स्थिती आहे. या खड्डयांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे पडून मरत आहेत. तर काही मोडत आहे. या मार्गाने एस.टी. महामंडळाच्या बस फेऱ्या कमी असल्यामुळे खासगी वाहणासाठी साहुर, बोरगाव, वडाळा, हा श्रतस सतत वर्दळीचा आहे. या नालीच्या खड्डयांमध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्याचे दिसून आले आहे.(वार्ताहर) खड्ड्यातील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसानगावात येणाऱ्या या रस्त्यावर असलेल्या नाल्यांत पाणी साचून ते रस्त्यालगत असलेल्या शेतात शिरत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्डे वाटसरुंना, वाहनाने जाणाऱ्यांना दिसत नसल्याने त्या खड्ड्यांत पडून त्यांचे अनेक अपघात झाले आहेत. या नाल्यांचे खड्डे त्वरित जर बुजविले नाही तर सर्व त्रस्त शेतकरी व गावकरी या मार्गावर रस्तारोको सत्याग्रह करतील असा इशार गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. आकोली-खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमयआकोली- खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमय झाला असला तरी प्रशासन चक्क डोळेझाकपणा केला आहे. सदर रस्त्यावर महाकाय खड्डे पडले असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न पडतो. खरांगणा ते बांगडापूर हा वर्दळीचा मार्ग आहे. सदर मार्गावर महाकाली मंदिर, ढगा भुवन आहे. शिवाय कारंजा व कोढांळी कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. या रस्त्यावर पावलो पावली मोठ मोठे खड्डे नजरेस पडतात. खरांगणा ते महाकाळी पर्यंत तर रस्त्याची गंभीर स्थिती आहे. महाकाळी पासून पुढे ३ कि़मी. अंतरापर्यंत दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र हा नव्याने झालेला रस्ता सुद्धा उखडला आहे. तर कुठे दबला आहे. मासोद ते ढगा पाटीपर्यंत तर रस्त्याची खराब झाला आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)