शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

इंटरनेट केबलचे खड्डे धोकादायक

By admin | Updated: October 17, 2016 01:14 IST

संपूर्ण भारतात ग्रामपंचायतींना आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.

खड्ड्यात पडून अनेकांना अपघात : दुर्लक्ष झाल्यास आंदोलनाचा इशारा साहूर : संपूर्ण भारतात ग्रामपंचायतींना आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे. याच आॅनलाईच्या कामाकरिता साहूर परिसरात केबल टाकण्याकरिता खड्डे खोदण्यात आले. हे खड्डे आज तसेच असून या खड्डयात पडून अनेक अपघात होत आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांचे आॅनलाईन अपघात होत असल्याच्या प्रतिक्रीया गावकऱ्यांकडून मिळत आहे. केबल टाकण्याकरिता खोदण्यात आलेल्या नाल्या ठेकेदाराने व्यवस्थती बुजविल्या नसल्याने येथे मोठ मोठे खड्डे कायम आहे. साहुरचे डॉ. प्रभाकर यांनी ठेकेदाराच्या जेसीबी चालविणाऱ्या कामागारांना नाल्या बुजविण्यासाठी हटकले, त्यांनी ठेकेदाराचा रस्ता रोकला. यावेळी ठेकेदराने नाल्या बुजविण्याचे आश्वासन दिले. आश्वासन देवून बेपत्ता झालेला ठेकेदार येथे अद्याप परत आला नसल्याने खड्डे आहे त्याच स्थिती आहे. या खड्डयांमध्ये शेतकऱ्यांची जनावरे पडून मरत आहेत. तर काही मोडत आहे. या मार्गाने एस.टी. महामंडळाच्या बस फेऱ्या कमी असल्यामुळे खासगी वाहणासाठी साहुर, बोरगाव, वडाळा, हा श्रतस सतत वर्दळीचा आहे. या नालीच्या खड्डयांमध्ये झाडे झुडपे वाढल्यामुळे या खड्ड्यांमुळे अपघात वाढत असल्याचे दिसून आले आहे.(वार्ताहर) खड्ड्यातील पाणी शेतात शिरल्याने पिकांचे नुकसानगावात येणाऱ्या या रस्त्यावर असलेल्या नाल्यांत पाणी साचून ते रस्त्यालगत असलेल्या शेतात शिरत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय रस्त्यांवरील खड्डे वाटसरुंना, वाहनाने जाणाऱ्यांना दिसत नसल्याने त्या खड्ड्यांत पडून त्यांचे अनेक अपघात झाले आहेत. या नाल्यांचे खड्डे त्वरित जर बुजविले नाही तर सर्व त्रस्त शेतकरी व गावकरी या मार्गावर रस्तारोको सत्याग्रह करतील असा इशार गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. आकोली-खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमयआकोली- खरांगणा ते बांगडापूर मार्ग खड्डेमय झाला असला तरी प्रशासन चक्क डोळेझाकपणा केला आहे. सदर रस्त्यावर महाकाय खड्डे पडले असल्याने वाहन कसे चालवावे असा प्रश्न पडतो. खरांगणा ते बांगडापूर हा वर्दळीचा मार्ग आहे. सदर मार्गावर महाकाली मंदिर, ढगा भुवन आहे. शिवाय कारंजा व कोढांळी कडे जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. या रस्त्यावर पावलो पावली मोठ मोठे खड्डे नजरेस पडतात. खरांगणा ते महाकाळी पर्यंत तर रस्त्याची गंभीर स्थिती आहे. महाकाळी पासून पुढे ३ कि़मी. अंतरापर्यंत दोन महिन्यापूर्वी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र हा नव्याने झालेला रस्ता सुद्धा उखडला आहे. तर कुठे दबला आहे. मासोद ते ढगा पाटीपर्यंत तर रस्त्याची खराब झाला आहे. सदर रस्त्यावर वाहन चालवणे धोकादायक झाले असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)