शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची आंतरमशागत खोळंबली

By admin | Updated: July 13, 2016 02:44 IST

गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता.

जिल्ह्यात पुन्हा संततधार : अनेक शेतात साचले पाणी; देवळीत नुकसानीचा सर्व्हे सुरू वर्धा : गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता. पावसामुळे जमिनीत पेरलेली बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या वाढीकरिता आंतरमशागत होणे गरजेचे आहे. अशातच मंगळवारी सकाळपासून पुन्हा संततधार पावसाने हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. आंतरमशागतीची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना पावसापासून जरा उघडीप मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी १५.१८ मिमी पावसाची नोंद झाली. यात वर्धा तालुक्यात १०.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सेलू ३, देवळी ७.१०, हिंगणघाट ११.२० समुद्रपूर २२, आर्वी २४, आष्टी (शहीद) २९ तर कारंजा (घाडगे) तालुक्यात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सकाळी ८ वाजताची असली तरी दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी थोडी उघडीप दिल्याचे दिसून आले. गत आठवड्यात जिल्ह्यात सेलू वगळता सात तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यातच निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडण्यात आल्याने वर्धा नदी परिसरात असलेल्या शेतात पाणी साचले होते. यात झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतरच झालेल्या नुकसानाचा अंदाज येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पाणी ओसरल्यावर शेतीची कामे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा मंगळवारी आलेल्या पावसामुळे मंदावल्या आहेत. यामुळे पावसाची पुन्हा सुरू झालेली रिपरिप बंद होण्याची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्यानंतर आलेल्या पावसामुळे बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या योग्य वाढीकरिता पिकांची आंतरमशागत वेळेवर होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून डवरणीची कामे सुरू झाली आहेत; मात्र पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित असल्याने आंतरमशागतीच्या कामांत व्यत्यय येत आहे. यामुळे पिकांना खत देण्याचे काम रखडले आहे. परिणामी आता किमान दोन ते चार दिवसांकरिता पाऊस थांबावा अशी इच्छा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) पुलाच्या बांधकामाअभावी शेताला तलावाचे स्वरूप देवळी - पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील फत्तेपूर-मुरदगाव रस्त्याच्या उंच भागामुळे शेतातील पाणी अडल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण शेतच पाण्याखली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फत्तेपूर-मुरदगाव मार्गावरील अरुण इंगोले यांच्या मालकीचे १० एकर शेत पुंडलिक जामनकर यांनी एक वर्षाच्या ठेक्याने घेतले. यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. शेताच्या ठेक्यासहित एक लाखांचा खर्च केला; परंतु शेतातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने त्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली आले. शेतपरिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. आता आम्ही आत्महत्या करायची काय, असा संतप्त सवाल जामनकर यांनी केला आहे. एकीकडे फत्तेपूर-मुरदगाव हा ग्रामीण रस्ता तर दुसरीकडे लोअर वर्धाच्या कॅनलमुळे या भागातील कास्तकारांची अडवणूक झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यावर पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविण्यात आले; परंतु याचा काहीच फायदा झाला नाही. अधिकाऱ्यांच्या कामचोर वृत्तीमुळे माझे नुकसान झाले असा आरोप संबंधित कास्तकाराने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्यासमक्ष केला. तहसीलदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून पुलाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.(प्रतिनिधी)