शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची आंतरमशागत खोळंबली

By admin | Updated: July 13, 2016 02:44 IST

गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता.

जिल्ह्यात पुन्हा संततधार : अनेक शेतात साचले पाणी; देवळीत नुकसानीचा सर्व्हे सुरू वर्धा : गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसापासून उघडीप मिळताच शेतकऱ्यांनी कामांना प्रारंभ केला होता. पावसामुळे जमिनीत पेरलेली बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या वाढीकरिता आंतरमशागत होणे गरजेचे आहे. अशातच मंगळवारी सकाळपासून पुन्हा संततधार पावसाने हजेरी लावली. या सततच्या पावसामुळे शेतीच्या कामांना पुन्हा ब्रेक लागला आहे. आंतरमशागतीची कामे रखडल्यामुळे शेतकऱ्यांना पावसापासून जरा उघडीप मिळण्याची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सरासरी १५.१८ मिमी पावसाची नोंद झाली. यात वर्धा तालुक्यात १०.१० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सेलू ३, देवळी ७.१०, हिंगणघाट ११.२० समुद्रपूर २२, आर्वी २४, आष्टी (शहीद) २९ तर कारंजा (घाडगे) तालुक्यात १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही नोंद सकाळी ८ वाजताची असली तरी दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी सुरू झालेल्या पावसाने सायंकाळी थोडी उघडीप दिल्याचे दिसून आले. गत आठवड्यात जिल्ह्यात सेलू वगळता सात तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. यातच निम्न वर्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडण्यात आल्याने वर्धा नदी परिसरात असलेल्या शेतात पाणी साचले होते. यात झालेल्या नुकसानीचा सर्व्हे करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतरच झालेल्या नुकसानाचा अंदाज येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पाणी ओसरल्यावर शेतीची कामे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा मंगळवारी आलेल्या पावसामुळे मंदावल्या आहेत. यामुळे पावसाची पुन्हा सुरू झालेली रिपरिप बंद होण्याची प्रतीक्षा शेतकरी वर्गाला लागली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पूर्ण पेरण्या आटोपल्या आहेत. पेरण्यानंतर आलेल्या पावसामुळे बियाणे अंकुरली आहेत. त्यांच्या योग्य वाढीकरिता पिकांची आंतरमशागत वेळेवर होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून डवरणीची कामे सुरू झाली आहेत; मात्र पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा पुरवित असल्याने आंतरमशागतीच्या कामांत व्यत्यय येत आहे. यामुळे पिकांना खत देण्याचे काम रखडले आहे. परिणामी आता किमान दोन ते चार दिवसांकरिता पाऊस थांबावा अशी इच्छा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी) पुलाच्या बांधकामाअभावी शेताला तलावाचे स्वरूप देवळी - पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत तालुक्यातील फत्तेपूर-मुरदगाव रस्त्याच्या उंच भागामुळे शेतातील पाणी अडल्याने परिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम न केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण शेतच पाण्याखली आल्याने संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फत्तेपूर-मुरदगाव मार्गावरील अरुण इंगोले यांच्या मालकीचे १० एकर शेत पुंडलिक जामनकर यांनी एक वर्षाच्या ठेक्याने घेतले. यामध्ये त्यांनी कपाशीची लागवड केली. शेताच्या ठेक्यासहित एक लाखांचा खर्च केला; परंतु शेतातील पाणी जाण्यास मार्ग नसल्याने त्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली आले. शेतपरिसराला तलावाचे स्वरुप आले आहे. आता आम्ही आत्महत्या करायची काय, असा संतप्त सवाल जामनकर यांनी केला आहे. एकीकडे फत्तेपूर-मुरदगाव हा ग्रामीण रस्ता तर दुसरीकडे लोअर वर्धाच्या कॅनलमुळे या भागातील कास्तकारांची अडवणूक झाली आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्यावर पुलाचे बांधकाम रखडल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास मार्ग नाही. यासाठी उन्हाळ्याच्या दिवसात अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविण्यात आले; परंतु याचा काहीच फायदा झाला नाही. अधिकाऱ्यांच्या कामचोर वृत्तीमुळे माझे नुकसान झाले असा आरोप संबंधित कास्तकाराने तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्यासमक्ष केला. तहसीलदार जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून पुलाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.(प्रतिनिधी)