शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

४९ हजार कुटुंबांशी साधणार संवाद

By admin | Updated: August 18, 2016 00:39 IST

स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे.

कुटुंबस्तर संवाद अभियान : ४३७ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेसाठी भेटीगाठी उपक्रम वर्धा : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत २२ आॅगस्ट ते २ आॅक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात कुटुंबस्तर संवाद अभियान राबविण्यात येत आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना नेमण्यात येणाऱ्या संवादकांमार्फत भेटी दिल्या जाणार आहेत. शिवाय जिल्ह्यातील २०१६-१७ या वार्षिक कृती आराखड्यात समाविष्ट ४३७ ग्रामपंचायतीमधील ४९ हजार २१८ कुटुंबांशी संवाद साधण्यात येणार आहे. यात ग्रामस्थांना शौचालयाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत शौचालयाचे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. जनजागृतीच्या माध्यमातून शौचालयाचे प्रमाण वाढवित असताना स्वच्छ भारत मिशनच्यावतीने प्रती शौचालय लाभार्थी १२ हजार रुपयांचा प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात येत आहे. यामुळे हळूहळू ग्रामीण भागात शौचालयाचे प्रमाणही वाढत आहे. शासनाच्या निर्देशानुसार २०१६-१७ या वर्षात संपूर्ण वर्धा जिल्हा हागणदारी मुक्त करावयाचा आहे. त्यानुसार ४३७ ग्रामपंचायतमधील ४९ हजार २१८ कुटुंबांना गृहभेटी अभियानात भेट देऊन शौचालयाचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. यात गावस्तरावरील ग्रामपंचायत पदाधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, गावस्तरीय कर्मचारी, विद्यार्थी, गट संसाधन केंद्रातील कर्मचारी, संपर्क अधिकारी आदी संवादक म्हणून काम करणार आहेत. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर प्रती कुटूंब ५० याप्रमाणे तीन संवाद गट तयार केले जाणार आहेत. प्रत्येक गटात दोन संवादक राहणार आहे. अभियान कालावधीमधील गृहभेटीचा आढावा नियमित तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर घेतला जाणार आहे. त्यांचा अहवाल शासनास नियमित दिला जाणार आहे. शासनाकडून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी निर्मलग्राम अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत शौचालय निर्मितीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे; पण ग्रामीण भागात शौचालयांप्रती जागरुकता नसल्याने गावे हागणदारी मुक्तीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.(कार्यालय प्रतिनिधी) अभियानाचा शुभारंभ ग्रामपंचायत स्तरावर गृहभेटी अभियानाचा शुभारंभ २२ आॅगस्ट रोजी ग्रामपंचायतस्तरावर करण्यात येणार आहे. यात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, संवादक प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे अभियानाचा शुभारंभ आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये करणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शौचालय आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत हागणदारीमुक्तीचे प्रयत्न होणार आहेत. सनियंत्रण अधिकारी अभियानाबाबत नियमितपणे माहिती जिल्हास्तरावर देण्याकरिता प्रत्येक तालुक्यात एका अधिकाऱ्याची सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. या अधिकाऱ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अभियानाच्या प्रगतिबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती देण्यात येणार आहे.