शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तचर विभाग, राजकीय पंडितांचीही कसोटी

By admin | Updated: October 16, 2014 23:29 IST

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्ष एकमेकांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. पर्यायाने या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना भलेभले राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर

निवडणुकीचे अंदाज : सर्वच मतदारसंघात धक्कादायक निकालाची चिन्हे, उत्सुकता शिगेलाराजेश निस्ताने - यवतमाळ तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्ष एकमेकांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. पर्यायाने या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना भलेभले राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही (इंटेलिजन्स ब्युरो) दमछाक होताना पहायला मिळत आहे. एकूणच १९ आॅक्टोबर रोजी सर्वच विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल हाती येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. कोणतीही निवडणूक म्हटली की त्याचे प्लस-मायनस, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येकच गावात असे काही ‘तज्ज्ञ’ असतातच. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, कोणत्या जातीची किती मते आहे, कोण व्यक्ती नेमके कुणाचे ऐकू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, काय हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकते याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पूर्वीपासून आकडेमोड करतात. अशा निवडणुकांचा दीर्घ अनुभव असल्याने स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरेही निघतात. असे अंदाज खरे निघणाऱ्यांची संख्या मात्र अवघी बोटावर मोजण्याऐवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. या पूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर प्रचंड विश्वास असतो. परंतु यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. कारण १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे व अन्य अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहे. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे. यवतमाळ, उमरखेड, वणी या मतदारसंघामध्ये तर पंचरंगी लढती आहेत. दिग्रस, पुसद, आर्णी-केळापूरमध्ये तिरंगी तर राळेगावमध्ये थेट दुहेरी लढत पहायला मिळत आहे. या बहुरंगी लढतीमुळे नेमके अंदाज बांधणे जमेनासे झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोणताही उमेदवार दहा हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊ शकणार नाही, यावर सर्वच राजकीय तज्ज्ञांचे एकमत होताना दिसत आहे. पंचरंगी लढती असलेल्या मतदारसंघात विजयी उमेदवार अगदी काठावर निघेल, असे मानले जात आहे. जिल्ह्यात सात पैकी तब्बल पाच जागा काँग्रेसच्या आहेत. परंतु यावेळी काँग्रेस बऱ्यापैकी मायनस होणार, असा अंदाज बांधला जात आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. यावेळी मात्र भाजपा खाते उघडण्यासोबतच त्यात बॅलन्सही ठेवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दोन-तीन जागांवरील आमदार पुन्हा निवडून येणार असे प्रत्येकच जण निवडणुकीच्या खूप आधीपासून तर मतदानाच्या दिवसापर्यंत दाव्याने सांगत होते. मात्र मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या तीन जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे अगदी स्फोटक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाचा राज्य गुप्त वार्ताविभाग (स्टेट इंटेलिजन्स) यावेळी पहिल्यांदाच प्रचंड संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी त्यांनी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय विश्लेषकांचीही परीक्षा पाहणाऱ्या ठरल्या आहेत.