शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल

By admin | Updated: October 6, 2015 02:57 IST

या देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर, देशाच्या विविधतेचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारताची विविधाच

वर्धा : या देशाची अखंडता अबाधित ठेवायची असेल तर, देशाच्या विविधतेचा सन्मान करणे गरजेचे आहे. भारताची विविधाच जगात आकर्षणाचा मोठा विषय आहे. अनेक भाषा, धर्म असूनही देश ‘एक’ असण्याचे जगातील एकमेव उदाहरण म्हणजे भारत. त्यामुळे देशाची अखंडता प्रेमाने टिकवावी लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय युवा योजनाचे संचालक आणि गांधीवादी विचारक एस. एन. सुब्बाराव यांनी केले. निवेदिता निलयम युवा केंद्रात आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनात युवकांना संबोधित करताना ते बोलत होते. ते म्हणाले, रशियामध्ये १८ भाषा होत्या म्हणून १८ तुकडे झाले. युगोस्लोविया मध्ये ३ भाषा असल्याने तीन तुकडे झालेत. चेकोस्लोवियाचे दोन भाषेमुळे दोन तुकडे झाले. पण भारतात १ हजार ६५२ मातृभाषा आणि १८ संवेधानिक भाषा असूनही भारत एक आहे. आपल्याला ही अखंडता पे्रमाच्या बळावर टिकवून ठेवावी लागेल. बंदुकीच्या किंवा दहशतवादाच्या बळावर आपण देशाची अखंडता टिकवू शकत नाही, असे सुब्बाराव तीन दिवसीय राष्ट्रीय युवा संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात म्हणाले. गीतेची सामाजिक बाजू, कृषी, स्वावलंबी अर्थव्यवस्था आणि विकासनीती, अशा विविध विषयांवर कनार्टकाचे गजानन स्वामी, पवनार आश्रमच्या भावीनी पारेख, डॉ. रामजी सिंह, डॉ. उल्हास जाजू, डॉ. सोहम पंड्या अश्या अनेक वक्त्यांनी आपली मते मांडली. यावेळी युवकांसाठी खुल्या सत्राचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये अनेक युवक सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी)