शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

१,१०० शेतकऱ्यांना विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:40 IST

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ठळक मुद्दे१८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश : प्रस्तावासाठी ३१ डिसेंबर ‘डेडलाईन’

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागत आहे. संकटे काही केल्या बळीराजाचा पिच्छा सोडत नाहीत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात बोंडअळीसह अन्य रोगांनी कहर केला. परिणामी, कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. कित्येक शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटल इतके तोकडे उत्पन्न झाले. सोयाबीन पिकाचीही अशीच अवस्था झाली. या पिकांच्या उत्पादनातून मिळालेल्या उत्पन्नातून शेतकरी रब्बी हंगामाकरिता जुळवाजुळव करतो. मात्र, बोंडअळी, रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डिसेंबरच्या मध्यात जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान पाऊसही कोसळला. यात अनेकांचा कापूस भिजला. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांकरिता काही अंशी मारक ठरले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून जातो की काय, अशी शेतकऱ्यांना धडकी भरली होती.फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेकदा वादळवाऱ्यांसह अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो. गत काही वर्षांपासून निसर्गचक्र सातत्याने बदलत असल्याने शेतकरी विम्याचे कवच घेतात. २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील कर्जदार ११०० तर १८ बिगर कर्जदार शेतकºयांनी विम्याचे संरक्षण घेतले. अद्याप बरेच शेतकरी या योजनेत सहभागी झालेले नाहीत. हंगामासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर असून शेतकºयांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.पिकनिहाय विमा हप्ता दर, रक्कमप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गहू बागायत आणि हरभरा पिकाकरिता विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के निर्धारित करण्यात आलेला आहे. गहू व हरभरा पिकाकरिता प्रति हेक्टर अनुक्रमे ५९९ व ३४६.५० विमा हप्ता रक्कम निश्चित करण्यात आली आहे.मुंबईतील कंपनीची नियुक्तीरब्बी हंगाम २०१८-१९ प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मुंबई येथील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.निसर्गचक्र विस्कळीतमानवी चुकांमुळे निसर्गचक्र विस्कळीत झाले आहे. परिणामी अल्प पर्जन्यमान, अवकाळी पाऊस सोबतच कीड, रोगांचा पादुर्भाव याचा शेतपिकांवर परिणाम होतो. यामुळे पीक विमा अत्यावश्यक झाला आहे..जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चच्यादरम्यान अवकाळी पाऊस, वादळवाºयाची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी शेतकºयांना नुकसानाला सामोरे जावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेतकºयांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करीत योजनचा लाभ घ्यावा. यामुळे आर्थिक स्थैर्य टिकण्यास मदत होईल.डॉ. विद्या मानकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा