शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

१,१०० शेतकऱ्यांना विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:40 IST

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

ठळक मुद्दे१८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश : प्रस्तावासाठी ३१ डिसेंबर ‘डेडलाईन’

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकाचे जिल्ह्यात दरवर्षी नुकसान होते. पीक नुकसानाच्या कालावधीत अत्यंत कठीण परिस्थितीतही आर्थिक स्थैर्य टिकून राहावे याकरिता शासनाकडून विमा योजना राबविली जाते. शेतकरी या योजनेत सहभागी होत पिकांचा विमा उतरवतात. २०१८-१९ या रब्बी हंगामात जिल्ह्यातील कर्जदार ११००, तर १८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागत आहे. संकटे काही केल्या बळीराजाचा पिच्छा सोडत नाहीत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील अनेक भागात बोंडअळीसह अन्य रोगांनी कहर केला. परिणामी, कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. कित्येक शेतकऱ्यांना एकरी दोन ते तीन क्विंटल इतके तोकडे उत्पन्न झाले. सोयाबीन पिकाचीही अशीच अवस्था झाली. या पिकांच्या उत्पादनातून मिळालेल्या उत्पन्नातून शेतकरी रब्बी हंगामाकरिता जुळवाजुळव करतो. मात्र, बोंडअळी, रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने डिसेंबरच्या मध्यात जिल्ह्यात आठवडाभर ढगाळ वातावरण होते. दरम्यान पाऊसही कोसळला. यात अनेकांचा कापूस भिजला. हे वातावरण रब्बी हंगामातील पिकांकरिता काही अंशी मारक ठरले. खरिपापाठोपाठ रब्बी हंगामही हातून जातो की काय, अशी शेतकऱ्यांना धडकी भरली होती.फेब्रुवारी, मार्च या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात अनेकदा वादळवाऱ्यांसह अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो. गत काही वर्षांपासून निसर्गचक्र सातत्याने बदलत असल्याने शेतकरी विम्याचे कवच घेतात. २०१८-१९ या वर्षांत जिल्ह्यातील कर्जदार ११०० तर १८ बिगर कर्जदार शेतकºयांनी विम्याचे संरक्षण घेतले. अद्याप बरेच शेतकरी या योजनेत सहभागी झालेले नाहीत. हंगामासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत ३१ डिसेंबर असून शेतकºयांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.पिकनिहाय विमा हप्ता दर, रक्कमप्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत गहू बागायत आणि हरभरा पिकाकरिता विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या १.५ टक्के निर्धारित करण्यात आलेला आहे. गहू व हरभरा पिकाकरिता प्रति हेक्टर अनुक्रमे ५९९ व ३४६.५० विमा हप्ता रक्कम निश्चित करण्यात आली आहे.मुंबईतील कंपनीची नियुक्तीरब्बी हंगाम २०१८-१९ प्रधानमंत्री पीक विमा योजनेकरिता जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मुंबई येथील भारती एक्सा जनरल इन्शुरन्स या कंपनीची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.निसर्गचक्र विस्कळीतमानवी चुकांमुळे निसर्गचक्र विस्कळीत झाले आहे. परिणामी अल्प पर्जन्यमान, अवकाळी पाऊस सोबतच कीड, रोगांचा पादुर्भाव याचा शेतपिकांवर परिणाम होतो. यामुळे पीक विमा अत्यावश्यक झाला आहे..जिल्ह्यात फेब्रुवारी, मार्चच्यादरम्यान अवकाळी पाऊस, वादळवाºयाची शक्यता असते. त्यामुळे दरवर्षी शेतकºयांना नुकसानाला सामोरे जावे लागते. पिकांचे नुकसान टाळण्याकरिता शेतकºयांनी लवकरात लवकर प्रस्ताव सादर करीत योजनचा लाभ घ्यावा. यामुळे आर्थिक स्थैर्य टिकण्यास मदत होईल.डॉ. विद्या मानकरजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा