शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

खासदारांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । केंद्र सरकारकडे तातडीची मदत मागणार, शेतकऱ्यांना दिला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील कपाशी पिकांसोबतच इतर शेतमालाबाबतची दुष्काळी स्थिती लक्षात घेता खासदार रामदास तडस यांनी या भागाची पाहणी केली.कपाशीचे पीक वाढले आहे. परंतु, बोंडे नाहीत. आहे ती बोंडे सततच्या पावसामुळे सडली आहेत. काही पऱ्हाट्या पिवळ्या पडून भडंगल्या आहे, अशा प्रकारची भावना खासदार तडस यांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र शासनाने या भागाची पाहणी करून नुकसानीचा आढावा घ्यावा. राज्य शासनाला तशा प्रकारचे निर्देश देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी खासदार तडस यांनी केली. यावेळी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, तालुका कृषी अधिकारी अतुल वायस व भिडीचे माजी सरपंच राजू रोकडे उपस्थित होते. यावेळी खासदार तडस यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून तालुक्यातील भिडी, दुरगुडा, हुस्रापूर, आकोली, चोंडी, हेटी आदी गावातील शेतमालाची पाहणी केली. काही ठिकाणी चार पदरी रस्त्याच्या उंच बांधकामामुळे तसेच यामुळे शेतातील पाणी बाहेर निघण्यास मार्ग नसल्याने सोयाबीनचे पीक पाण्याखाली येऊन जागीच सडले आहे. लाल्यामुळे कपाशीचे पीक भडंगले असून आजच नसल्यात जमा झाले आहे. पाणबसन जमिनीतील सोयाबीनचे पीक अजूनही सवंगण्याअभावी पडले आहे. हुस्रापूर येथील सुभाष फुलकर वाबगावातील धनराज पाल, चोंडी येथील राजू रोकडे, भिडी येथील विनोद पांडे, प्रमोद कडूकर, मनोज बोबडे तसेच आकोली येथील भगवान बोडे यांच्या शेतातील पऱ्हाटी व सोयाबीन पिकाची दैना झाली आहे. तालुक्यात पाच हजार ७५५ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला. यापैकी ५ हजार ४५७ शेतकऱ्यांच्या पीककर्जातून विम्याची रक्कम कपात करण्यात आली. २९८ शेतकºयांनी पीक विम्याची रक्कम भरली. या विम्याचा फायदा शेतमालाला होईल काय? याबाबत अधिकाºयांकडे उत्तर नसल्याने हा विमा दरवर्षीप्रमाणे स्टंट ठरू पाहत आहे. शासनाने लक्ष देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी खासदार तडस यांनी केली आहे.पावसामुळे बाधीत झालेल्या शेतमालाचे पंचनामे करण्यासाठी शासनाने आदेश दिले आहे. येत्या ३ ते ४ दिवसांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. पंचनामे नि:पक्ष पद्धतीने केली जाणार आहे.- अतुल वायस, तालुका कृषी अधिकारी, देवळी

टॅग्स :agricultureशेतीRamdas Tadasरामदास तडस