शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

उभ्या पिकांवर किटकांचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:15 IST

१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे.

ठळक मुद्दे२१ गावांत बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव न होता भरघोस उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना उभ्या पिकांवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी व लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव तब्बल २१ गावांमधील उभ्या पिकांवर असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले असून तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस या किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्याही अडचणीत भर पडली आहे.१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. सद्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, बालापूर, चाणकी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच वर्धा तालुक्यातील पालोती, तळेगाव, सेलू तालुक्यातील खापरी, देवळी तालुक्यातील गुजीखेडा, कवठा हिंगणघाट तालुक्यातील धामनगाव, खापर, माडला, बाबापुर, सातेफळ, भिवापूर, आर्वी तालुक्यातील मदना व आष्टी तालुक्यातील नरसिंगापुर येथे रसशोषण करणाºया किडीचा म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. सायोबीन पिकाची १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत हे पीक फुलोरा अवस्थेत असून पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील कवठा येथे आढळून आला आहे. तर वर्धा तालुक्यातील भिवापूर, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व कडाजना या गावामध्ये या पिकावर ऊंटअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. तर कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी या गावात मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजना केल्यास या किटकांना अटकाव घालता येत असला तरी योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही शेतकºयांची आहे.

टॅग्स :agricultureशेती