शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांवर किटकांचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:15 IST

१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे.

ठळक मुद्दे२१ गावांत बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव न होता भरघोस उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना उभ्या पिकांवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी व लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव तब्बल २१ गावांमधील उभ्या पिकांवर असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले असून तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस या किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्याही अडचणीत भर पडली आहे.१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. सद्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, बालापूर, चाणकी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच वर्धा तालुक्यातील पालोती, तळेगाव, सेलू तालुक्यातील खापरी, देवळी तालुक्यातील गुजीखेडा, कवठा हिंगणघाट तालुक्यातील धामनगाव, खापर, माडला, बाबापुर, सातेफळ, भिवापूर, आर्वी तालुक्यातील मदना व आष्टी तालुक्यातील नरसिंगापुर येथे रसशोषण करणाºया किडीचा म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. सायोबीन पिकाची १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत हे पीक फुलोरा अवस्थेत असून पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील कवठा येथे आढळून आला आहे. तर वर्धा तालुक्यातील भिवापूर, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व कडाजना या गावामध्ये या पिकावर ऊंटअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. तर कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी या गावात मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजना केल्यास या किटकांना अटकाव घालता येत असला तरी योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही शेतकºयांची आहे.

टॅग्स :agricultureशेती