शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

उभ्या पिकांवर किटकांचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:15 IST

१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे.

ठळक मुद्दे२१ गावांत बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव न होता भरघोस उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना उभ्या पिकांवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी व लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव तब्बल २१ गावांमधील उभ्या पिकांवर असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले असून तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस या किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्याही अडचणीत भर पडली आहे.१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. सद्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, बालापूर, चाणकी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच वर्धा तालुक्यातील पालोती, तळेगाव, सेलू तालुक्यातील खापरी, देवळी तालुक्यातील गुजीखेडा, कवठा हिंगणघाट तालुक्यातील धामनगाव, खापर, माडला, बाबापुर, सातेफळ, भिवापूर, आर्वी तालुक्यातील मदना व आष्टी तालुक्यातील नरसिंगापुर येथे रसशोषण करणाºया किडीचा म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. सायोबीन पिकाची १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत हे पीक फुलोरा अवस्थेत असून पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील कवठा येथे आढळून आला आहे. तर वर्धा तालुक्यातील भिवापूर, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व कडाजना या गावामध्ये या पिकावर ऊंटअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. तर कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी या गावात मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजना केल्यास या किटकांना अटकाव घालता येत असला तरी योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही शेतकºयांची आहे.

टॅग्स :agricultureशेती