शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या पिकांवर किटकांचा अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:15 IST

१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे.

ठळक मुद्दे२१ गावांत बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी, लष्करीअळीचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत दोन वर्ष निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागला आहे. यंदा कुठल्याही किटकांचा प्रादुर्भाव न होता भरघोस उत्पन्न होईल, अशी आशा शेतकऱ्यांना असताना उभ्या पिकांवर गुलाबी बोंडअळी, तुडतुडे, चक्रीभुंगा, ऊंटअळी व लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव तब्बल २१ गावांमधील उभ्या पिकांवर असल्याचे कृषी विभागाच्या पाहणीत पुढे आले असून तशी नोंदही कृषी विभागाने घेतली आहे. दिवसेंदिवस या किटकांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांच्याही अडचणीत भर पडली आहे.१ जुन ते २६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६६२.२ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात खरीप ज्वारीची ९७२.२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून सद्यस्थितीत हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. तर कपाशीची लागवड २ लाख ३४ हजार ९५७ हेक्टरवर झाली आहे. सद्या हे पीक फुलोरा अवस्थेत आहे. परंतु, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव, बालापूर, चाणकी येथे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तसेच वर्धा तालुक्यातील पालोती, तळेगाव, सेलू तालुक्यातील खापरी, देवळी तालुक्यातील गुजीखेडा, कवठा हिंगणघाट तालुक्यातील धामनगाव, खापर, माडला, बाबापुर, सातेफळ, भिवापूर, आर्वी तालुक्यातील मदना व आष्टी तालुक्यातील नरसिंगापुर येथे रसशोषण करणाºया किडीचा म्हणजे तुडतुड्यांचा प्रादुर्भाव या पिकावर दिसून येत आहे. सायोबीन पिकाची १ लाख ७ हजार २२७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत हे पीक फुलोरा अवस्थेत असून पिकावर चक्रीभुंगाचा प्रादुर्भाव देवळी तालुक्यातील कवठा येथे आढळून आला आहे. तर वर्धा तालुक्यातील भिवापूर, हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगाव व कडाजना या गावामध्ये या पिकावर ऊंटअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. तर कारंजा (घा.) तालुक्यातील गवंडी या गावात मका पिकावर लष्करीअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.कृषी विभागाच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात उपाययोजना केल्यास या किटकांना अटकाव घालता येत असला तरी योग्य मार्गदर्शनाअभावी शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे. शिवाय तशी मागणीही शेतकºयांची आहे.

टॅग्स :agricultureशेती