शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

पायका योजनेंतर्गत बांधलेल्या क्रीडांगणाची चौकशी करा

By admin | Updated: May 17, 2014 23:50 IST

शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़

विरूळ (आकाजी) : शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़ असाच प्रकार सध्या क्रीडा क्षेत्रातही पाहावयास मिळत आहे़ शासनाद्वारे क्रीडांगणासाठी निधी दिला जातोय; परंतु केवळ फलकांपुरते क्रीडांगण दाखवून निधीचा अपहार केला जातो़ यात हजारो रुपयांचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे़ ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे़ त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीला निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फत तालुक्यातील काही निवडक गावात क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ त्याचप्रमाणे आणि तालुक्यातही पंचायत समितीस्तरावर १४ गावांना या क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ यात विरूळ, रसुलाबाद, रोहणा, धनोडी, दहेगाव (मुस्तफा), देऊरवाडा, वर्धमनेरी, मांडला, वडगाव, वाढोणा, मोरांगणा, जळगाव, वाठोडा व शिरपूर आदी गावांचा समावेश आहे़ क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध झाल्याने वाठोडा व शिरपूर वगळता १२ गावामध्ये क्रीडांगण तयार झालीत, परंतु काही महिन्यातच या क्रीडांगणाची वाताहत झाली आहे़ लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या क्रीडांगणावर आज विद्यार्थी खेळत नसले तरी गुरे-ढोरे मात्र हमखास चरतांना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत उगविल्याने नेमके क्रीडांगण कोठे आहे़ याचा शोध घ्यावा लागतो़ या क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ काही गावात गावाच्या बाहेर दूर क्रीडांगणे बांधल्या गेली़ त्यामुळे विद्यार्थी क्रीडांगणावर खेळण्यास जातच नसल्याचे दिसते़ क्रीडांगण तयार करण्यासाठी एक लाख रुपये ग्रामपंचायतींना देण्यात आले़ मैदान तयार झाले़ पण खेळाडूंच्या साहित्यासाठी अद्यापही निधी न मिळाल्याने हे क्रीडांगणे शोभेची वस्तू ठरली आहे़ क्रीडांगणाच्या बांधकामाची जबाबदारी पंचायत समितीचा शाखा अभियंता व ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली. ही संधी मिळताच काही ग्रामसेवकांनी मर्जितल्या ठेकेदाराला काम देत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या कामात गौडबंगाल झाल्याचा संशय येतो़ यामुळे संबंधीत अधिकार्‍यांनी क्रीडागणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)