शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

पायका योजनेंतर्गत बांधलेल्या क्रीडांगणाची चौकशी करा

By admin | Updated: May 17, 2014 23:50 IST

शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़

विरूळ (आकाजी) : शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्‍यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़ असाच प्रकार सध्या क्रीडा क्षेत्रातही पाहावयास मिळत आहे़ शासनाद्वारे क्रीडांगणासाठी निधी दिला जातोय; परंतु केवळ फलकांपुरते क्रीडांगण दाखवून निधीचा अपहार केला जातो़ यात हजारो रुपयांचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे़ ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे़ त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीला निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फत तालुक्यातील काही निवडक गावात क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ त्याचप्रमाणे आणि तालुक्यातही पंचायत समितीस्तरावर १४ गावांना या क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ यात विरूळ, रसुलाबाद, रोहणा, धनोडी, दहेगाव (मुस्तफा), देऊरवाडा, वर्धमनेरी, मांडला, वडगाव, वाढोणा, मोरांगणा, जळगाव, वाठोडा व शिरपूर आदी गावांचा समावेश आहे़ क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध झाल्याने वाठोडा व शिरपूर वगळता १२ गावामध्ये क्रीडांगण तयार झालीत, परंतु काही महिन्यातच या क्रीडांगणाची वाताहत झाली आहे़ लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या क्रीडांगणावर आज विद्यार्थी खेळत नसले तरी गुरे-ढोरे मात्र हमखास चरतांना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत उगविल्याने नेमके क्रीडांगण कोठे आहे़ याचा शोध घ्यावा लागतो़ या क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ काही गावात गावाच्या बाहेर दूर क्रीडांगणे बांधल्या गेली़ त्यामुळे विद्यार्थी क्रीडांगणावर खेळण्यास जातच नसल्याचे दिसते़ क्रीडांगण तयार करण्यासाठी एक लाख रुपये ग्रामपंचायतींना देण्यात आले़ मैदान तयार झाले़ पण खेळाडूंच्या साहित्यासाठी अद्यापही निधी न मिळाल्याने हे क्रीडांगणे शोभेची वस्तू ठरली आहे़ क्रीडांगणाच्या बांधकामाची जबाबदारी पंचायत समितीचा शाखा अभियंता व ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली. ही संधी मिळताच काही ग्रामसेवकांनी मर्जितल्या ठेकेदाराला काम देत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या कामात गौडबंगाल झाल्याचा संशय येतो़ यामुळे संबंधीत अधिकार्‍यांनी क्रीडागणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)