शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आष्टी व कारंजा तालुक्यांवर अन्याय

By admin | Updated: December 3, 2014 22:54 IST

जिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र

दुष्काळी स्थिती असतानाही पैसेवारी ५० च्या वरराजेश भोजेकर - वर्धाजिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १३४१ पैकी १०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा आत आहे, तर उर्वरित २९२ गावांची पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यामध्ये आष्टी व कारंजा तालुक्यासह आर्वी तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. परिणामी, या गावातील शेतकऱ्यांची या दुष्काळी स्थितीशी झुंज सुरू असतानाही त्यांच्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचे सुल्तानी संकट आहे.यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पावसाला सुरूवात झाल्यामुळे हा हंगामच अडचणीत आला. जिल्ह्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सावकाराचे दार ठोठावावे लागले. पीक कसेबसे वाढले मात्र उत्पन्न नाममात्र आल्यामुळे झालेला खर्चही निघाला नाही. जी पिके शेतात आहे, तीही खर्च भरून काढून शकेल, याची शाश्वती नाही. असे असताना कारंजा आणि आष्टी तालुक्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी दाखविली नाही़ यावरून शासनाचा हा अहवाल कितपत खरा आहे, यावरच शंका उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनास पाठविलेल्या अहवालानुसार कारंजातील सर्व १२० व आष्टीतील सर्व १३६ गावांसह आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. हा खटाटोप टेबलावरून बसून करण्यात आल्याचे शेतकरी बोलत आहे. शासनाचा कोणताही कर्मचारी पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिवारात आला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. मग हा अहवाल कितपत न्यायसंगत आहे, असा प्रश्न उपलब्ध होतो. खरीप हंगामात आष्टी तालुक्याला लागूनच अमरावती विभाग सुरू होतो. या विभागातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आत आहे. मग, पाऊस जिल्ह्याच्या सीमा पाहूनच पडला की काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.