शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आष्टी व कारंजा तालुक्यांवर अन्याय

By admin | Updated: December 3, 2014 22:54 IST

जिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र

दुष्काळी स्थिती असतानाही पैसेवारी ५० च्या वरराजेश भोजेकर - वर्धाजिल्ह्यातील १३८७ गावे खरीप हंगाम पिकाखाली आहे. पैकी प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणाने तसेच लागवडयोग्य नसल्यामुळे पेरणी केली न जाणारी ४६ गावे वगळता खरीप पिकास पात्र १३४१ पैकी १०४९ गावांची खरीप पिकांची सुधारीत हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा आत आहे, तर उर्वरित २९२ गावांची पैसेवारी मात्र ५० पैशापेक्षा अधिक असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यामध्ये आष्टी व कारंजा तालुक्यासह आर्वी तालुक्यातील ३६ गावांचा समावेश आहे. परिणामी, या गावातील शेतकऱ्यांची या दुष्काळी स्थितीशी झुंज सुरू असतानाही त्यांच्यावर शासकीय मदतीपासून वंचित राहण्याचे सुल्तानी संकट आहे.यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी पावसाला सुरूवात झाल्यामुळे हा हंगामच अडचणीत आला. जिल्ह्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना सावकाराचे दार ठोठावावे लागले. पीक कसेबसे वाढले मात्र उत्पन्न नाममात्र आल्यामुळे झालेला खर्चही निघाला नाही. जी पिके शेतात आहे, तीही खर्च भरून काढून शकेल, याची शाश्वती नाही. असे असताना कारंजा आणि आष्टी तालुक्यातील एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी दाखविली नाही़ यावरून शासनाचा हा अहवाल कितपत खरा आहे, यावरच शंका उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने शासनास पाठविलेल्या अहवालानुसार कारंजातील सर्व १२० व आष्टीतील सर्व १३६ गावांसह आर्वीतील ३६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. हा खटाटोप टेबलावरून बसून करण्यात आल्याचे शेतकरी बोलत आहे. शासनाचा कोणताही कर्मचारी पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी शिवारात आला नसल्याचे शेतकरी सांगत आहे. मग हा अहवाल कितपत न्यायसंगत आहे, असा प्रश्न उपलब्ध होतो. खरीप हंगामात आष्टी तालुक्याला लागूनच अमरावती विभाग सुरू होतो. या विभागातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी ५० च्या आत आहे. मग, पाऊस जिल्ह्याच्या सीमा पाहूनच पडला की काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.