शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:24 IST

शेतकऱ्यांच्या खालावत असलेल्या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बँकेकडून सहजरित्या कर्ज मिळत नाही.

ठळक मुद्देयुवा परिवर्तनचा उपक्रम : शिवाजी महाराजांना दिले प्रतिकात्मक निवेदन

आॅनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्यांच्या खालावत असलेल्या परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. बँकेकडून सहजरित्या कर्ज मिळत नाही. बियाणे महाग झाले आणि मजूरी वाढली. शेतमालाल भाव मिळत नाही. सरकारचे धोरणच याला जबाबदार असल्याचा आरोप करीत युवा परिवर्तन की आवाज संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रतिकात्मक निवेदन दिले.शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निद्रीस्त सरकारला शेतकरी प्रश्नांबाबत जागे करण्यासाठी स्थानिक शिवाजी पुतळा येथे जाऊन निवेदन दिले. छत्रपती शिवरायांनी बळीराजाकरिता हितकारक कायदे केले होते. मात्र आता परिस्थिती पालटली आहे. कुठे आणून ठेवलाय देश माझा. आपल्या स्वराज्यात रयतेचे राज्य होते. आता मात्र फक्त नावाकरिता रयतेचे राज्य आहे. येथे एकप्रकारे हुकूमशाही सुरू झाली आहे. जगाचा पोशिंदा असणारा बळीराजा रोज आत्महत्या करतोय. तो जगाला जगवतोय पण त्याला जगणे मात्र आता कठीण झाले आहे, अशा शब्दात शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला.पेरणीपासून ते पीक हाती येईपर्यंत शेतकरी त्याची जपणूक करतो. उत्पन्न झाले तर शेतमालाला भाव न मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. ही परिस्थिती ओढविण्यास कुठे ना कुठे सरकार जबाबदार आहे. सत्तेवरील सरकारने दिलेल्या आश्वासनाची अद्याप पूर्तता केली नाही. शेतकºयाच्या सोयाबीन, तूर, कापूस या प्रमुख पिकाला हमीभाव मिळाला नाही. कर्जमाफी जाहीर झाली मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. नुकत्याच झालेल्या गारपिटीने आधीच दु:खात असलेल्या पोशिंद्यावर संकटाचे डोंगर कोसळले आहे. यावर पर्याय म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र सरकार हे शांतपणे बसून पाहत आहे. आपण जाणते राजे आहात म्हणून या निवेदनाद्वारे विनंती आहे की परिस्थिती बदलवून शेतकºयाला जगण्याची संधी द्या. त्याला त्याचा हक्क द्या. युवा परिवर्तन की आवाज संघटनेने विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन शिवाजी महाराजांना प्रतिकात्मक स्वरूपात दिले. यावेळी संस्थापक अध्यक्ष निहाल पांडे, जिल्हा अध्यक्ष पलाश उमाटे, उपाध्यक्ष कोमल झाडे आदि उपस्थित होते.शासनाकडून साथ मिळत नाहीशेतीकरिता लागणारे बी-बियाणे महाग झाले. किटकनाशक आणि मजूरी वाढली. बँकांमधून शेतीसाठी कर्ज मिळत नाही. यावरून तरी सावकाराकडून कर्ज घेऊन शेती करण्यास शासनाकडून प्रवृत्त केले जात असल्याचे चित्र आहे.कधी जंगली जनावरांमुळे शेतमालाचे नुकसान होते तर कधी निसर्ग साथ देत नाही. या सगळ्यांत पीक भरघोस आले तर तर सरकार साथ दित नाही. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कर्जाचा डोंगर कायम राहतो, अशी व्यथा निवेदनातून व्यक्त केली.