शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पोळ्यावर महागाईचे सावट

By admin | Updated: August 29, 2016 00:33 IST

शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे.

शेतकरी चिंतेत : बैलांची संख्या घटतीवर आर्वी : शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे. या स्थितीमुळे बाजारात असलेल्या साहित्य खरेदीकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. साहित्याला महागाईची झळ बसल्याने शेतकऱ्यांना ते असह्य होत आहे. यामुळे त्याने बाजाराकडे पाठ केल्याचे दिसत आहे. सणाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांचा पाचोळा होण्याची वेळ आली आहे. जर एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत. याच दिवसात पोळा सण आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. वर्षभर शेतात इमानेइतबारे कबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा पोळा हा सण बळीराज नेहमीच आगळावेगळा आणि उत्साहाने साजरा करतो. त्याचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न त्याच्याकडून होतो. सध्या निसर्गाकडून होत असलेली अवकृपा, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्री करणे सुरू केले आहे. परिणामी बैलांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बैलांचा साज आसमानाला रंगबेरंगी कासरे, १०० रुपये पर्यंत तर देखणी गोडे ५० रुपये, बाशींग जोडी १०० रुपये, वेसन ७५ रुपये, गोडे झुल्याचे १५० रुपये, तोडे घुंगरे ५०० रुपये जोडी, कापडी माळ २५० रुपये, मठाटी १०० रुपये, जोडी तर बासींग फुल १०० रुपये जोडी, जिलेटींग पेपर गेरू, आॅईल पेन्ट आदी शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या वस्तूंचे भाव दामदुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा पोळा सण महागाईच्या विळख्यात सापडला आहे. आपला बैल जोडीच्या भरोश्यावर बाराही महिने राबराब राबून त्याच्या भरोश्यावर शेती पिकवून साऱ्यांच्या पोटाला अन्न देणाऱ्या बळीराजाचे त्याच्या बैलावर जीवापाड प्रेम असते. यामुळे त्याच्या साजात बळीराजाकडून कसर होत नाही. अशा स्थितीतही पोळा सण साजरा करण्याकरिता शेतकरी मागे येत नाही.