शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

पोळ्यावर महागाईचे सावट

By admin | Updated: August 29, 2016 00:33 IST

शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे.

शेतकरी चिंतेत : बैलांची संख्या घटतीवर आर्वी : शेतकऱ्यांचा सण पोळा काही दिवसांवर आला आहे. या पोळ्यावर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची झळ असल्याचे दिसत आहे. या स्थितीमुळे बाजारात असलेल्या साहित्य खरेदीकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. साहित्याला महागाईची झळ बसल्याने शेतकऱ्यांना ते असह्य होत आहे. यामुळे त्याने बाजाराकडे पाठ केल्याचे दिसत आहे. सणाच्या तोंडावरच पावसाने दडी मारल्याने बळीराजाच्या नजरा पावसाकडे लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांचा पाचोळा होण्याची वेळ आली आहे. जर एक दोन दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या संकटात वाढ होण्याची चिन्हे आहेत. याच दिवसात पोळा सण आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे. वर्षभर शेतात इमानेइतबारे कबाडकष्ट करणाऱ्या बैलांचा पोळा हा सण बळीराज नेहमीच आगळावेगळा आणि उत्साहाने साजरा करतो. त्याचे ऋण फेडण्याचा एक प्रयत्न त्याच्याकडून होतो. सध्या निसर्गाकडून होत असलेली अवकृपा, चाऱ्याचा भेडसावणारा प्रश्न यामुळे शेतकऱ्यांनी बैल विक्री करणे सुरू केले आहे. परिणामी बैलांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. बैलांचा साज आसमानाला रंगबेरंगी कासरे, १०० रुपये पर्यंत तर देखणी गोडे ५० रुपये, बाशींग जोडी १०० रुपये, वेसन ७५ रुपये, गोडे झुल्याचे १५० रुपये, तोडे घुंगरे ५०० रुपये जोडी, कापडी माळ २५० रुपये, मठाटी १०० रुपये, जोडी तर बासींग फुल १०० रुपये जोडी, जिलेटींग पेपर गेरू, आॅईल पेन्ट आदी शेतकऱ्यांच्या उपयोगी असलेल्या वस्तूंचे भाव दामदुप्पट झाल्याने शेतकऱ्यांचा पोळा सण महागाईच्या विळख्यात सापडला आहे. आपला बैल जोडीच्या भरोश्यावर बाराही महिने राबराब राबून त्याच्या भरोश्यावर शेती पिकवून साऱ्यांच्या पोटाला अन्न देणाऱ्या बळीराजाचे त्याच्या बैलावर जीवापाड प्रेम असते. यामुळे त्याच्या साजात बळीराजाकडून कसर होत नाही. अशा स्थितीतही पोळा सण साजरा करण्याकरिता शेतकरी मागे येत नाही.