शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मिरचीवर विषाणूजन्य आजाराची लागण

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील

गिरड : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात मिरचीची लागवड केली. मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्यानंतर रबीतील भाजीपाला उत्पादनावर वातावरणाच्या बदलाने किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी मिरची पिकांवर विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या वातावरणामुळे खरिपातील शेतपिकांनी शेतकऱ्यांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या सततच्या हवामान बदलामुळे खरिपातील शेतपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी कायमच वैतागला आहे. शेतपिकावर केलेला उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले असताना रबी हंगामात ढगाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरची पिकाला विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हैराण आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना नाइलाजास्तव भाजीपाला पीक लागवडीतून मिरची पिकाला हद्दपार करावे लागत आहे. एका बाजूला वाळल्या मिरचीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. शिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांच्या फवारणीवर बराच खर्च केला आहे. मिरची पिकाला वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला खर्च निष्फळ ठरला आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात मिरचीची लागवड करतात. लगतच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र यावर्षी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. या भागातील मिरची उत्पादनावर विदर्भातील बाजारपेठ अवलंबून आहे. मात्र उत्पादन घटल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मिरचीच्या उत्पादनावर केलेला खर्च यंदा व्यर्थ ठरला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.(वार्ताहर)