शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

मिरचीवर विषाणूजन्य आजाराची लागण

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील

गिरड : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात मिरचीची लागवड केली. मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्यानंतर रबीतील भाजीपाला उत्पादनावर वातावरणाच्या बदलाने किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी मिरची पिकांवर विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या वातावरणामुळे खरिपातील शेतपिकांनी शेतकऱ्यांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या सततच्या हवामान बदलामुळे खरिपातील शेतपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी कायमच वैतागला आहे. शेतपिकावर केलेला उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले असताना रबी हंगामात ढगाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरची पिकाला विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हैराण आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना नाइलाजास्तव भाजीपाला पीक लागवडीतून मिरची पिकाला हद्दपार करावे लागत आहे. एका बाजूला वाळल्या मिरचीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. शिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांच्या फवारणीवर बराच खर्च केला आहे. मिरची पिकाला वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला खर्च निष्फळ ठरला आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात मिरचीची लागवड करतात. लगतच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र यावर्षी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. या भागातील मिरची उत्पादनावर विदर्भातील बाजारपेठ अवलंबून आहे. मात्र उत्पादन घटल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मिरचीच्या उत्पादनावर केलेला खर्च यंदा व्यर्थ ठरला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.(वार्ताहर)