शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

मिरचीवर विषाणूजन्य आजाराची लागण

By admin | Updated: December 31, 2014 23:30 IST

निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील

गिरड : निसर्गाच्या प्रकोपाने आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी वेगवेगळी पिकांचे उत्पादन घेत आहे. समुद्रपूर तालुक्यातील गिरड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा रबी हंगामात मिरचीची लागवड केली. मात्र त्यावर रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने मोठे नुकसान होत आहे. खरीप हंगामातील पीक हातचे गेल्यानंतर रबीतील भाजीपाला उत्पादनावर वातावरणाच्या बदलाने किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर्षी मिरची पिकांवर विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बदलत्या वातावरणामुळे खरिपातील शेतपिकांनी शेतकऱ्यांना दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या वर्षीच्या सततच्या हवामान बदलामुळे खरिपातील शेतपिकांच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाल्याने शेतकरी कायमच वैतागला आहे. शेतपिकावर केलेला उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले असताना रबी हंगामात ढगाळी वातावरणामुळे भाजीपाला पिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मिरची पिकाला विषाणूजन्य (बोकड्या) रोगाची लागण झाल्याने शेतकरी हैराण आहे. मिरची पिकावरील विषाणूजन्य रोग फवारणीने नियंत्रित होत नसल्याने पीक उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली आहे. यावर्षी शेतकऱ्यांना नाइलाजास्तव भाजीपाला पीक लागवडीतून मिरची पिकाला हद्दपार करावे लागत आहे. एका बाजूला वाळल्या मिरचीच्या भावात तेजी निर्माण झाली आहे. शिवाय भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांच्या महागड्या औषधांच्या फवारणीवर बराच खर्च केला आहे. मिरची पिकाला वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला खर्च निष्फळ ठरला आहे. जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी काही प्रमाणात मिरचीची लागवड करतात. लगतच्या नागपूर जिल्ह्यातील भिवापूर, उमरेड तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतात; मात्र यावर्षी विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने मिरचीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. या भागातील मिरची उत्पादनावर विदर्भातील बाजारपेठ अवलंबून आहे. मात्र उत्पादन घटल्याने भावात तेजी निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मिरचीच्या उत्पादनावर केलेला खर्च यंदा व्यर्थ ठरला आहे. कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज आहे.(वार्ताहर)