शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

संत्र्यावर अज्ञात रोगाचे सावट

By admin | Updated: February 9, 2016 01:53 IST

परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे.

झाडे वाळत असल्याने शेतकरी चिंतेत : शेतकऱ्यांना मदतीची मागणीआष्टी (शहीद) : परिश्रम घेऊन उभ्या केलेल्या संत्रा बागांवर सध्या अज्ञात रोगाचे सावट आल्याचे दिसते. संत्रा झाडे वाळत चालली आहे. सर्व उपाययोजना करूनही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे संत्राबागा वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे.मागील वर्षी अंबीया बहार मोठ्या प्रमाणात आल्याने कवडीमोल भावाने संत्रा विकावा लागला. यावर्षी मृग बहार दमदार असून भावही चांगले मिळण्याची शक्यता आहे; पण लहरी निसर्ग केव्हा कोपणार याचा भरवसा राहीला नाही. अचानक संत्रा बागा वाळत असल्याने हातचे पीक जाण्याची वेळ आली आहे. संत्रा झाडांची देखभाल करताना शेतकरी कुठलीही कसर ठेवत नाही. दरवर्षी छाट देऊन त्याला खत देणे, चुना व गुळाचे मिश्रण करून मारणे, खत घालणे, नियमित पाणी देणे एवढे करूनही संत्रा झाड वाळत आहेत. पाण्याची कमतरता असलेल्या गाव शिवारातील शेतकऱ्यांनी दूरवरून डोक्यावर पाणी आणून बागा जिवंत ठेवल्या आहेत; पण संत्राबागा एकाएकी वाळत असल्याचे दिसते. १०० झाडांमागे २५ झाडे वाळत आहेत. यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सूचवून मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाला आहे. विहिरीच्या पाण्याची पाणी पातळी खालावत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. विहिरीच्या पाण्यावर संत्राबागेचे सिंचन अवलंबून आहे. मृग बहाराची संत्री संगोपण करण्यासह वाळलेल्या झाडांना नष्ट करण्याचे कामही तालुक्यात सुरू आहे. माणिकवाडा, साहुर, तारासावंगा परिसरातील संत्रा बागा दव गेल्याने वाळत असल्याची माहिती साहूरच्या शेतकऱ्यांनी दिली. शासनाने सर्व्हे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही केली आहे. महसूल व कृषी विभागाने अद्यापही सर्वेक्षण मोहीम घेतली नाही. यामुळे शेतकऱ्यांना मदतीकरिता प्रतीक्षाच करावी लागत आहे.(प्रतिनिधी)उपाययोजनाही ठरताहेत निकामीबदलत्या वातावरणामुळे फळपिकांवर विविध रोगांचे आक्रमण होत आहे. यासाठी कृषी विज्ञान केंद्र सेलसूरा यांच्याकडून उपाययोजना सुचविण्यात आल्या; पण या ते उपाय करूनही परिसरातील अनेक बागायतदार शेतकऱ्यांच्या बागांतील संत्रा झाडे वाळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत देणेच गरजेचे झाले आहे. नियोजित बागांवरही फायटोप्थोरा रोगसंत्रा बागांचे नियोजन व आखणी तालुका कृषी विभागाकडून करण्यात आली होती; पण त्या बागांवरही फायटोप्थोरा रोग आला आहे. शिवाय वातावरणातील बदलामुळे बागा वाळत आहेत. यावर तालुका कृषी विभागाने संशोधन करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे; पण अद्यापही कृषी विभागाने लक्ष दिलेले नाही. संत्रा फळबागा सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी तालुका कृषी विभागाची आहे; पण हा विभाग अयोग्य नियोजन व दुर्लक्षित धोरण बागळून असल्याने त्याचा कुठलाही उपयोग झाला नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. किमान आता संत्राबागा वाळत असताना तरी शेतकऱ्यांना उपाययोजना सुचवाव्या व सर्वेक्षण करून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.