शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मनुष्य निर्मितीनंतरच भारताची निर्मिती होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:42 IST

चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे शिरीष देशपांडे : भारत विद्यालयातील व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.भारत विद्यालयात स्व. भास्करराव भीमनवार यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ देशपांडे पूढे म्हणाले की, या देशात खुलेआम भारत तेरे तुकडे होंगे, असे म्हणणारी एक विचारधारा आहे. दुसरीकडे या देशातील मातीवर अफाट प्रेम करणारी विचारधारा आहे. यापैकी कोणती विचारधारा आपण निवडायची, हे आधी ठरवा. या मातीवर प्रेम करता आले पाहिजे; पण त्यासाठी केवळ चांगले असून भागत नाही तर त्या चांगुलपणाचे रक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी जाती-पातीचे राजकारण नाकारले पाहिजे. आम्ही जात पाळत असू तर आम्ही जनावरांपेक्षाही चुकीचे वागत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी राजांनी मदारीसारखा राष्ट्रवादी मुस्लिम जवळ केला तर त्याच वेळी या देशाविरूद्ध लढणारा जयसिंग दूर लोटला, हा इतिहास आपल्यापूढे आहे. म्हणूनच मातीवर प्रेम करीत असतानाच भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाºयांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भीमनवार होते. प्रास्ताविक वसंत आंबटकर यांनी केले. परिचय रमेश धारकर यांनी करून दिला. समरसता मंचाचे जिल्हा कार्यवाह बी.जी. खैरकार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कल्पना मोरे यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, रेखा भीमनवार, वर्धा नागरी बँकेचे संचालक रमेश टपाले, संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संचालक विजय अग्रवाल, संजय देशपांडे, हरिहर लोंढेकर, वामनराव खोडे, संजय मेमोरीयलच्या सचिव वैशाली वणीकर, अ‍ॅड. साहित्यलक्ष्मी देशपांडे, शहरातील मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.