शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्य निर्मितीनंतरच भारताची निर्मिती होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 23:42 IST

चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे शिरीष देशपांडे : भारत विद्यालयातील व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : चारित्र्यवान मनुष्याची निर्मिती झाली तरच बलशाली भारताचे निर्माण शक्य आहे. त्यासाठीच स्व. भा.ल. भीमनवार यांच्या कार्याकडे आपणास पाहावे लागेल, असे मत वणी येथील नियोजित विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक डॉ. शिरीष गोपाळराव देशपांडे यांनी व्यक्त केले.भारत विद्यालयात स्व. भास्करराव भीमनवार यांच्या स्मृत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. डॉ देशपांडे पूढे म्हणाले की, या देशात खुलेआम भारत तेरे तुकडे होंगे, असे म्हणणारी एक विचारधारा आहे. दुसरीकडे या देशातील मातीवर अफाट प्रेम करणारी विचारधारा आहे. यापैकी कोणती विचारधारा आपण निवडायची, हे आधी ठरवा. या मातीवर प्रेम करता आले पाहिजे; पण त्यासाठी केवळ चांगले असून भागत नाही तर त्या चांगुलपणाचे रक्षण करता आले पाहिजे. त्यासाठी जाती-पातीचे राजकारण नाकारले पाहिजे. आम्ही जात पाळत असू तर आम्ही जनावरांपेक्षाही चुकीचे वागत आहोत, हे लक्षात घेतले पाहिजे. शिवाजी राजांनी मदारीसारखा राष्ट्रवादी मुस्लिम जवळ केला तर त्याच वेळी या देशाविरूद्ध लढणारा जयसिंग दूर लोटला, हा इतिहास आपल्यापूढे आहे. म्हणूनच मातीवर प्रेम करीत असतानाच भारत तेरे तुकडे होंगे म्हणणाºयांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रदीप भीमनवार होते. प्रास्ताविक वसंत आंबटकर यांनी केले. परिचय रमेश धारकर यांनी करून दिला. समरसता मंचाचे जिल्हा कार्यवाह बी.जी. खैरकार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. संचालन दत्ता भांगे यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका कल्पना मोरे यांनी मानले.कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, न.प.अध्यक्ष प्रेम बसंतानी, पं.स. सभापती गंगाधर कोल्हे, रेखा भीमनवार, वर्धा नागरी बँकेचे संचालक रमेश टपाले, संस्थेचे उपाध्यक्ष श्याम भीमनवार, संचालक विजय अग्रवाल, संजय देशपांडे, हरिहर लोंढेकर, वामनराव खोडे, संजय मेमोरीयलच्या सचिव वैशाली वणीकर, अ‍ॅड. साहित्यलक्ष्मी देशपांडे, शहरातील मान्यवर उपस्थित होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.