शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

भारत-थायलंड सांस्कृतिक संबंध प्रगाढ करणारा त्रिभाषी कोष

By admin | Updated: May 11, 2014 00:33 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील ...

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील संबंधाना ऊजाळा मिळणार असल्याचे प्रतिपादन शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापकांसह थायलंडच्या संशोधकांचा समावेश होता. हिंदी-थाई-इंग्रजी या तीन भाषांचा समावेश असलेला त्रिभाषी कोश एम.ए.हिंदी, अनुवाद प्रौद्योगिकी विषयाचे शिक्षण घेत असलेल्या वुत्थिफोड थविन या विद्यार्थ्यांसह शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण कोष तयार केला आहे. या कोषाबाबत माहिती देताना संशोधक म्हणाले, यातून अनेक तथ्य प्रदर्शित झाले आहेत. या संशोधनातून सांस्कृतिक पर्यटन, पर्यावरण पर्यटन, शिक्षण आणि धार्मिक पर्यटन यांची सांगोपांग चर्चा करण्यात आली आहे. या कोषात जवळपास ५०० शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ज्यात हिंदी-थाई आणि इंग्रजी शब्दांचा समावेश आहे. भारत आणि थायलंड या दोन देशात सामाजिक, सांस्कृतिक साधर्म्य आहे. ते भाषा व शब्दांमधून प्रदर्शित होते. यावेळी काही उदाहरण देण्यात आले. जसे, हिंदीत पूजा तर थाई भाषेत बूजा, नरक ला नरोक, असे संबोधले जाते. पर्यटन एक आंतरराष्ट्रीय विषय आहे. उभय देशात हा व्यापक विषय झाला आहे. भारताच्या दृष्टीने बुद्धगया, सारनाथ, हिमालयाच्या रांगा, गंगा नदी इत्यादी ठिकाणे पर्यटनाला वाव देणार्‍या आहेत. येथे थायलंडचे पर्यटक भेट देतात. थायलंडही भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शोधातून सांस्कृतिक पर्यटनाच्या संदर्भात असे मांडण्यात आले की, भारतात दिवाळी आणि संक्रात हे सण साजरे केले जातात. तसे थायलंडमध्ये दिवाळीला लॉय-क्र-थाड आणि संक्रांतीला सोंक्रांत या नावाने सण साजरे करण्यात येते. लॉय-क्र-थाड हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला साजरा करतात. हा त्यांचा बारावा महिना असतो. या सणाला केळीच्या पानांपासून किंवा कागदापासून छत्री बनवतात आणि त्यात दिवा व मोमबत्ती लावून ती नदी किंवा तलावात सोडली जाते. थायलंडच्या पर्यटन विकासात हिंदी सिनेमाची मोलाची भर घातली आहे. राम आणि रावण यांच्यावर आधारित नाटकांचे प्रदर्शन होते. लोककलावंत नाटके सादर करतात अशी माहिती दिलि. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक, धार्मिक विषयावर चर्चा करणात आली.(स्थानिक प्रतिनिधी)