शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

भारत-थायलंड सांस्कृतिक संबंध प्रगाढ करणारा त्रिभाषी कोष

By admin | Updated: May 11, 2014 00:33 IST

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील ...

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात थायलंडच्या विद्यार्थ्यानी पर्यटन क्षेत्राचा त्रिभाषी कोष तयार केला असून यातून भारत-थायलंड या उभय देशातील संबंधाना ऊजाळा मिळणार असल्याचे प्रतिपादन शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठातील प्राध्यापकांसह थायलंडच्या संशोधकांचा समावेश होता. हिंदी-थाई-इंग्रजी या तीन भाषांचा समावेश असलेला त्रिभाषी कोश एम.ए.हिंदी, अनुवाद प्रौद्योगिकी विषयाचे शिक्षण घेत असलेल्या वुत्थिफोड थविन या विद्यार्थ्यांसह शोध निर्देशक डॉ. अन्नपूर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण कोष तयार केला आहे. या कोषाबाबत माहिती देताना संशोधक म्हणाले, यातून अनेक तथ्य प्रदर्शित झाले आहेत. या संशोधनातून सांस्कृतिक पर्यटन, पर्यावरण पर्यटन, शिक्षण आणि धार्मिक पर्यटन यांची सांगोपांग चर्चा करण्यात आली आहे. या कोषात जवळपास ५०० शब्दांचा वापर करण्यात आला आहे. ज्यात हिंदी-थाई आणि इंग्रजी शब्दांचा समावेश आहे. भारत आणि थायलंड या दोन देशात सामाजिक, सांस्कृतिक साधर्म्य आहे. ते भाषा व शब्दांमधून प्रदर्शित होते. यावेळी काही उदाहरण देण्यात आले. जसे, हिंदीत पूजा तर थाई भाषेत बूजा, नरक ला नरोक, असे संबोधले जाते. पर्यटन एक आंतरराष्ट्रीय विषय आहे. उभय देशात हा व्यापक विषय झाला आहे. भारताच्या दृष्टीने बुद्धगया, सारनाथ, हिमालयाच्या रांगा, गंगा नदी इत्यादी ठिकाणे पर्यटनाला वाव देणार्‍या आहेत. येथे थायलंडचे पर्यटक भेट देतात. थायलंडही भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. या शोधातून सांस्कृतिक पर्यटनाच्या संदर्भात असे मांडण्यात आले की, भारतात दिवाळी आणि संक्रात हे सण साजरे केले जातात. तसे थायलंडमध्ये दिवाळीला लॉय-क्र-थाड आणि संक्रांतीला सोंक्रांत या नावाने सण साजरे करण्यात येते. लॉय-क्र-थाड हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला साजरा करतात. हा त्यांचा बारावा महिना असतो. या सणाला केळीच्या पानांपासून किंवा कागदापासून छत्री बनवतात आणि त्यात दिवा व मोमबत्ती लावून ती नदी किंवा तलावात सोडली जाते. थायलंडच्या पर्यटन विकासात हिंदी सिनेमाची मोलाची भर घातली आहे. राम आणि रावण यांच्यावर आधारित नाटकांचे प्रदर्शन होते. लोककलावंत नाटके सादर करतात अशी माहिती दिलि. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर सांस्कृतिक, धार्मिक विषयावर चर्चा करणात आली.(स्थानिक प्रतिनिधी)