शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

बदलत्या ॠतूमानाने रुग्णसंख्येत वाढ

By admin | Updated: August 11, 2016 00:33 IST

पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे.

आजारांचे थैमान : जुलै महिन्याअखेर २९ हजारांवर रुग्णांची नोंद वर्धा : पावसामुळे बदलते ॠतुमान, ठिकठिकाणी साचत असलेले सांडपाणी आणि अस्वच्छता यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. यात संसर्गजन्य व श्वसनाचे आजार सर्वाधिक आहे. जुलै महिन्यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्णांची तर १ हजार ८३९ आंतररुग्णांची नोंद करण्यात आली. त्याचप्रमाणे १ ते १० आॅगस्ट दरम्यान १० हजार ६६१ बाह्यरुग्ण तर ३०० च्या वर आंतररुग्ण असल्याचे आढळून आले आहे. सर्वाधिक आजार हे पाणी आणि दूषित हवेमुळे होतात. यामुळेच पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात सर्वत्र आजारांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये दूषित पाण्यापासून होत असलेल्या डायरिया, गॅस्ट्रो आणि हवेमुळे पसरत असलेल्या सर्दी, खोकला आदी आजारांच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाद्वारे या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविले जात आहेत. असे असले तरी रुग्णसंख्येत घट होत नसल्याचे वास्तव आहे. नागरिक स्वच्छतेबाबत अजूनही तितक्या प्रमाणात जागरुक नसल्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात येते. जुलै महिन्यात जिल्ह्यात एकूण २८ हजार ८२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात २६ हजार ९८५ बाह्यरुग्ण तर १ हजार ८३९ आंतररुग्ण होते. आॅगस्ट महिन्यात आतापर्यंत आंतर व बाह्यरुग्ण मिळून जवळपास ११ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दररोज रुग्णांची वाढती गर्दी पाहता हा आकडा या महिन्यात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.(शहर प्रतिनिधी)