शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पिपरी व १३ गावांसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना

By admin | Updated: May 3, 2017 00:35 IST

पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य

२७.४४ कोटींचा खर्च : जीवन प्राधिकरण करणार काम वर्धा : पिपरी(मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या २७ कोटी ४४ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजुरी प्रदान केली आहे. शहरासभोवताल झपाट्याने वाढणाऱ्या लोकवस्तीच्या गरजेनुसार पाणीपुरवठा उपलब्ध होण्याकरिता ही वाढीव योजना उपयोगी ठरणार आहे. तसे पत्र पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी मुंबई येथे दिल्याची माहिती वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत या वाढीव योजनेचे काम होणार आहे. या मंजुरीमुळे पिपरी (मेघे), कारला, साटोडा, आलोडी, नालवाडी, दत्तपूर, मसाळा, उमरी(मेघे), सावंगी(मेघे), बोरगाव(मेघे) आणि वायगाव(नि.) या गावांसह सिंदी(मेघे), सालोड(हिरापूर) येथील नवीन वस्तींना वाढीव पाणीपुरवठा योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेंतर्गत एकूण सात पाणीटाक्यांची निर्मिती केली जाणार आहे. उमरी(मेघे) व सिंदी(मेघे) या गावांकरिात ८ लाख लिटरची एकत्रित टाकी, पिपरी (मेघे) गावासाठी ३.५० लाख लिटरची टाकी, सावंगी(मेघे) करिता ९.५० लाख लिटरची टाकी, बोरगावसाठी २ लाख लिटर, आलोडा व साटोडासाठी ४ लाख लिटरची, नालवाडी व दत्तपुरसाठी एकत्रित ७.५० लाख लिटरची, वायगाव(नि.) साठी दोन लाख लिटरची टाकी बनविण्यात येणार आहे.(प्रतिनिधी) नव्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या या वाढीव योजनेंतर्गत संबंधित गावांना शुद्ध पाणी प्राप्त व्हावे, याकरिता पाणीनलिका अंथरण्यात येणार आहे. या १४ गावामध्ये २१० किलोमीटर लांबीची जलवाहिनी (पाईपलाईन ) अंथरण्यात येईल. सध्या जुन्या योजनेवर १५ हजार ५०० नळजोडण्या आहेत. नवीन वाढीव योजनेमुळे आणखी तीन ते चार हजार नळजोडण्या देणे शक्य होणार आहे. या १४ गावांची सन २०२७ मधील संभाव्य लोकसंख्या २ लाख ३९ हजार ३१९ गृहीत धरुन त्यानुसार या वाढीव योजनेचे कार्यान्वयन होणार आहे. या वाढीव योजनेंतर्गत टाक्या जलदगतीने भरण्याकरिता ३०० बीएचपीचे मोटारपंप वापरले जाणार आहेत. या वाढीव योजनेतही नळजोडणी घेणाऱ्यांकडे मीटर बसविले जाणार असून, जितका पाण्याचा वापर, तितके देयक असणार आहे. यातुन पाणी बचतीविषयीही जागृती निर्माण होईल, असे आमदार डॉ. भोयर यांनी कळविले आहे. पिपरी (मेघे) व १३ गावे वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास व आराखड्यात मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मान्यता दिल्याचे आमदार डॉ. भोयर म्हणाले. दोन वर्षांची मुदत येत्या एक महिन्यात पिपरी(मेघे) व १३ वाढीव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाची निविदा निघणार असून, येत्या दोन वर्षांत ही योजना पूर्ण करायची आहे. या योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यावर किमान तीन वर्षे कंत्राटदाराला योजना चालविणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजना यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे की नाही, याची खात्री जीवन प्राधिकरणाने करायची आहे. या योजनेचे कार्यान्वयन जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता पी.एस. वाघ यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता व्ही.पी. उमाळे व शाखा अभियंता प्रदीप चवडे हे करणार आहेत.